Skip to main content

ॲबॅकस स्पर्धेत डिंगोरे येथील चार विध्यार्थी अव्वल दहा मध्ये.

समर्थ भारत वृत्तसेवा

बनकर फाटा, ता. २५ : गणित हा विषय ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजही अवघड समजला जातो. परंतु हाताच्या बोटावर  अतिशय सोप्या पद्धतीने गणित सोडवण्याची कला ॲबॅकसने शिकवली, एव्हरेस्ट बॅकस क्लासेसच्या स्नेहल लोहाटे यांनी ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून आंतरराष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेमध्ये उतरवले आणि अवघड वाटणाऱ्या गणिताला सोपे केले.

नुकत्याच झालेल्या ऑनलाईल ॲबॅकस स्पर्धेमध्ये ५ ते १४ वयोगटातील राज्यातून ३२९९ विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला होता. तर एव्हरेस्ट क्लासेसच्या एकूण १४ विध्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन १०० टक्के निकाल दिला. पैकी राज्यात अव्वल दहा मध्ये या पैकी चार विद्यार्थिनींनी स्थान मिळवत डिंगोरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याने परिसरातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांकडून यशस्वी विद्यार्थी व मार्गशक शिक्षिका स्नेहल लोहाटे यांचे कौतुक होत आहे.

त्याच बरोबर पाच मिनिटात ४० पेक्षा जास्त गणिते सोडविणाऱ्या उर्वरित दहा विध्यार्थ्यांवर देखील अभिनंदनचा वर्षाव होताना दिसत आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवीण्यात आले. या वेळी सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामागे स्नेहल लोहाटे यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले, असे मत यावेळी उपस्थित पालकांनी व्यक्त केले

राज्यात अव्वल दहा मध्ये आलेल्या चार विद्यायार्थीनी

श्रावणी संतोष पाडेकर -  ५ मिनिटात ६६ गणिते

नियती तुषार तांबे - ५मिनिटात ६४ गणिते

अदिती रुपेश डुंबरे- ५ मिनिटात ५६ गणिते

वेदिका योगेश हांडे - ५ मिनिटात ५३ गणिते


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.