Skip to main content

महावितरण विभागाकडून मागणी कामांची पाहणी व पूर्ण करण्याचे आश्वासन, दैनिक समर्थ भारतच्या वृत्ताचा परिणाम.

समर्थ भारत वृत्तसेवा

कवठे येमाई, ता.२५:  महावितरण विभागाकडून कवठे येमाई (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून ती कामे लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. यामध्ये मुख्यतः पुरातन फत्तेश्वर मंदिराच्या आवारात असणाऱ्या ३३/२२ के.व्ही. ट्रांसफार्मरची जागा बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन शिरुरचे उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने यांनी प्रत्यक्ष जागेला भेट दिली व तो ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याचे आश्वासित केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाजीराव उघडे व भरत भोर हे उपस्थित होते.

माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी कार्यकारी अभियंता महावितरण केडगाव यांना कवठे पांजरपोळ नवीन रोहित्र बसविणे,कवठे गणेश नगर माळीमळा नवीन रोहित्र बसवणे, कवठे फत्तेश्वर मंदिर रोहित्र स्थलांतर करणे, कवठे डांगे चौक लाईन स्थलांतरित करणे, कवठे काळे आळी गावठाण तारा ओढणे या कामांबद्दल पत्र दिले होते. यासाठी माजी पंचायत समिती सदस्य सुदाम इचके, माजी सरपंच दीपक रत्नपारखी, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सांडभोर, बाळासाहेब डांगे, दिनेश काळे, दत्तात्रय घोडे यांनी पाठपुरावा केला होता. तसेच कवठेचे सरपंच, उपसरपंच, ग्राम विकास अधिकारी, सर्व सदस्यांकडूनही फत्तेश्वर मंदिराजवळील ट्रांसफार्मर बदलण्यासंबंधी महावितरणशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. 

दैनिक समर्थ भारत मध्ये रविवार दि.१९ रोजी रोहित्रची जागा बदलणे बाबतचे वृत्त दिले होते, त्याची दखल घेऊन महावितरण आणि संबंधितांनी कार्यवाही केली. त्याबद्दल दैनिक समर्थ भारतचे आभार. (सुनीता पोकळे, सरपंच)


 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.