Skip to main content

कल्याण विशाखापट्टनम महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा.

समर्थ भारत वृत्तसेवा


                                                 
बेल्हे, ता. २६: कल्याण विशाखापट्टनम महामार्गावर रविवारी (दि. २६) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बेल्हे गावच्या हद्दीत टेम्पो आणि पीकअपची समोरासमोर जोदार धडक बसून दोघांचा मृत्यू झाला असुन नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली.                     

कल्याण विशाखापट्टनम महामार्गावरील बेल्हे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नगरच्या दिशेने येत असलेली एम.एच.४३ बी.पी.३१०८ या पिकअप गाडीला जी.जे.०६ बि.टी.८९११ या मालवाहू टेंम्पो गाडीची जोरात धडक बसल्याने पिकअप गाडी मधील रिपुसुदन पांडे (वय ५४) व चंद्रकला पांडे(वय ४६ ) हे दोघे जण मुत्यूमुखी पडले तर चांदणी रिपुसुदन पांडे, पौर्णिमा मुरलीधर पांडे, अनिता मधुसुदन पांडे, पल्लवी रीपुसुदन पांडे, अर्पणा मुरलीधर पांडे, वसंत जितेंद्र रायसिंगभाई, मुरलीधर मधुसुदन पांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण घणसोली मुंबई येथील रहिवासी असुन ते एकाच कुटुंबातील असुन शनि शिंगणापूर या ठिकाणी देवदर्शन करून भिमाशंकर या ठिकाणी चालले होते. 

जखमी झालेल्या सर्वांना आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी अपघात झाल्यानंतर जवळपास दोन तासांनी आळेफाटा पोलीस घटना स्थळी पोहोचल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रदिप पिंगट यांनी नाराजी व्यक्त केली असून सर्व जखमींना आळेफाटा येथे रुग्णवाहिकेत बसवून देण्यासाठी संजय पिंगट, प्रदिप पिंगट व इतर स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केले. समोरासमोर धडक झाल्याने गाडीचा चक्काचूर झाला आहे. याबाबत आळेफाटा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.                        

बेल्हे गावाच्या हद्दीतून  कल्याण विशाखापट्टनम , बेल्हे शिरुर तसेच बेल्हेजेजुरी हे महामार्ग गेले आहेत. बेल्हे परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. शिरुर, पारनेर ,आंबेगाव या तालुक्यांच्या हद्दी जवळच असल्याने वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली असल्याने लहानमोठे अपघात, चोरीच्या घटना, लहानमोठ्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत चालल्याने बेल्हे गावात पोलीस ठाणे होणे गरजेचे आहे.  (प्रदिप पिंगटसामाजिक कार्यकर्ते)       

रुग्णवाहिका चालक बेलकर यांचे सहकार्य 

यावेळी रुग्णवाहिका चालक नवनाथ बेलकर यांनी जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी म्हणून सहकार्य केले. तसेच शासकीय १०८ नंबरची रुग्णवाहिका व राजुरी येथील अकबर पठाण यांचीही रुग्णवाहिका अगदी वेळेत उपलब्ध झाल्याबद्दल प्रदीप पिंगट आणि ग्रामस्थांनी त्यांचेही आभार मानले.


      

 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.