Skip to main content

कल्याण विशाखापट्टनम महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा.

समर्थ भारत वृत्तसेवा


                                                 
बेल्हे, ता. २६: कल्याण विशाखापट्टनम महामार्गावर रविवारी (दि. २६) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बेल्हे गावच्या हद्दीत टेम्पो आणि पीकअपची समोरासमोर जोदार धडक बसून दोघांचा मृत्यू झाला असुन नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली.                     

कल्याण विशाखापट्टनम महामार्गावरील बेल्हे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नगरच्या दिशेने येत असलेली एम.एच.४३ बी.पी.३१०८ या पिकअप गाडीला जी.जे.०६ बि.टी.८९११ या मालवाहू टेंम्पो गाडीची जोरात धडक बसल्याने पिकअप गाडी मधील रिपुसुदन पांडे (वय ५४) व चंद्रकला पांडे(वय ४६ ) हे दोघे जण मुत्यूमुखी पडले तर चांदणी रिपुसुदन पांडे, पौर्णिमा मुरलीधर पांडे, अनिता मधुसुदन पांडे, पल्लवी रीपुसुदन पांडे, अर्पणा मुरलीधर पांडे, वसंत जितेंद्र रायसिंगभाई, मुरलीधर मधुसुदन पांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण घणसोली मुंबई येथील रहिवासी असुन ते एकाच कुटुंबातील असुन शनि शिंगणापूर या ठिकाणी देवदर्शन करून भिमाशंकर या ठिकाणी चालले होते. 

जखमी झालेल्या सर्वांना आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी अपघात झाल्यानंतर जवळपास दोन तासांनी आळेफाटा पोलीस घटना स्थळी पोहोचल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रदिप पिंगट यांनी नाराजी व्यक्त केली असून सर्व जखमींना आळेफाटा येथे रुग्णवाहिकेत बसवून देण्यासाठी संजय पिंगट, प्रदिप पिंगट व इतर स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केले. समोरासमोर धडक झाल्याने गाडीचा चक्काचूर झाला आहे. याबाबत आळेफाटा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.                        

बेल्हे गावाच्या हद्दीतून  कल्याण विशाखापट्टनम , बेल्हे शिरुर तसेच बेल्हेजेजुरी हे महामार्ग गेले आहेत. बेल्हे परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. शिरुर, पारनेर ,आंबेगाव या तालुक्यांच्या हद्दी जवळच असल्याने वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली असल्याने लहानमोठे अपघात, चोरीच्या घटना, लहानमोठ्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत चालल्याने बेल्हे गावात पोलीस ठाणे होणे गरजेचे आहे.  (प्रदिप पिंगटसामाजिक कार्यकर्ते)       

रुग्णवाहिका चालक बेलकर यांचे सहकार्य 

यावेळी रुग्णवाहिका चालक नवनाथ बेलकर यांनी जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी म्हणून सहकार्य केले. तसेच शासकीय १०८ नंबरची रुग्णवाहिका व राजुरी येथील अकबर पठाण यांचीही रुग्णवाहिका अगदी वेळेत उपलब्ध झाल्याबद्दल प्रदीप पिंगट आणि ग्रामस्थांनी त्यांचेही आभार मानले.


      

 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.