Skip to main content

पहाटे लागलेल्या आगीमुळे चार कुटुंब आले उघड्यावर; लाखो रुपयांचे नुकसान.

समर्थ भारत वृत्तसेवा:

करंजी येथे पहाटे भीषण आग लागली. या आगीत एक-दोन नव्हे तर तब्बल चार कुटुंब उघड्यावर आले. त्यांची गुरढोर होरपळून गेली. गोठे जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत ३९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान दहा लाख ५१  हजार आठशे रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. करंजी लहाने येथे सकाळी चार वाजता ही आग लागली.

दलित वस्तीत, अचानक लागलेल्या आगीत सुधाकर किसन कांबळे यांच्या ३९ बकऱ्या असलेल्या गोठा जळाला. आगीने एवढे रुद्र रूप धारण केले की, सकाळी संपूर्ण गाव झोपेत असताना आग सर्वत्र पसरली. सुधाकर किसन कांबळे यांच्या शेजारी असणारे दत्ता वानखेडे यांच्या सुद्धा म्हशीच्या गोठ्यालाही आग लागली. त्यांचेसुद्धा लाखाच्या वर नुकसान झाले. आग तिथे न थांबता बाजूच्या बाळू खंदारे यांच्यासुद्धा घराला लागली. त्यांच्या घरच्या अन्नधान्याची नासाडी झाली. तेथून पुढे शेजारीच राहणारे शेषराव सीताराम खिल्लारी यांच्यासुद्धा गुरांचा गोठा जळाला. त्यांची तिथे ठेवले असलेले तीन स्पिंकलर संच, अंदाजे ९० पाईप व शेतीचे संपूर्ण भांडवल जळून खाक झाले. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात आली नाही. तेव्हा शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमक दलाला पाचारण केले. अग्निशमक दलाने आग विझवून पुढील अनर्थ टाळला.

गावकऱ्यांनी आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात आली नाही. तेव्हा शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमक दलाला पाचारण केले. अग्निशमक दलाने आग विझवून पुढील अनर्थ टाळला.

घटनास्थळाचा पंचनामा करून अंदाजे दहा लाख ५१ हजार आठशे रुपये एवढे नुकसान झाले. असे तलाठी गणेश बेदरकर यांनी पंचनामा करताना सांगितले. वरील चार कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांनी शासन दरबारी मदतीची याचना केली आहे.


 

 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.