Skip to main content

शाहिरांनी धमण्यातली रग जिवंत ठेवण्याचे कार्य केले : महावीर जोंधळे.

समर्थ भारत वृत्तसेवा

तळेगाव ढमढेरे, ता. २७ : शाहिरांनी धमण्यातली रग जिवंत ठेवण्याचे कार्य केले. संतांचा रोज एक अभंग समजून घेतला तर जगणे समृद्ध होते. बहिणाबाईंची कविता आयुष्याचा अर्थ सांगते म्हणून नव्या पिढीने वाचनाकडे जाणीवपूर्वक वळले पाहिजे असे मत साहित्यिक महावीर जोंधळे यांनी व्यक्त केले.              

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात प्रख्यात साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस "जागतिक मराठी भाषा दिन" म्हणून साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या मराठी विभागाने यानिमित्त "लेखक आपल्या भेटीला" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ लेखक व पत्रकार महावीर जोंधळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जी.पी.सातव हे होते. याप्रसंगी बोलताना डॉ.जोंधळे म्हणाले की आपण घडत असताना  वि.वा. शिरवाडकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. इंदिरा संत, शांताबाई शेळके, ग. दि.माडगूळकर, विंदा करंदीकर, ग्रेस आदी मान्यवरांच्या सानिध्यात आल्यानंतर लेखक म्हणून घडणे शक्य झाले. मात्र त्यासाठी झपाटून जाणे हा स्वभाव झाला पाहिजे. आभासी जगात हरवून जाण्यापेक्षा स्वतःच्या अंतरंगात डोकवा, अर्थपूर्ण जगण्याचा ध्यास घ्या असेही ते म्हणाले. आपल्या सहजीवनाची हकीकत सांगताना महिन्याला पैसे नको , सोने नको, पण पुस्तके पाहिजेत असे सांगणारी जीवनसाथी मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

प्राचार्य डॉ. गंगाधर सातव यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा लाभ घेतला पाहिजे, अधिकाधिक पुस्तके आणून ग्रंथालय समृद्ध करण्यावर भर दिला जाईल. मात्र चांगले वाचकही घडले पाहिजेत असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. सूरज शिराळे याने आपल्या कवितेचे सादरीकरण केले. श्रावणी कोंढेकर हिने नृत्यातून गणेश वंदना सादर केली. या कार्यक्रमाला प्रा.डॉ. शोभा तितर, डॉ. सपना राणे, डॉ. मेघना भोसले, डॉ. सुनीता डाकले व सर्व प्राध्यापक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी या दिवशी महाराष्ट्रीय पोशाख परिधान करून हा दिवस साजरा केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.महादू बागुल यांनी  केले. विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी आभार व्यक्त केले. 


 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.