Skip to main content

शाहिरांनी धमण्यातली रग जिवंत ठेवण्याचे कार्य केले : महावीर जोंधळे.

समर्थ भारत वृत्तसेवा

तळेगाव ढमढेरे, ता. २७ : शाहिरांनी धमण्यातली रग जिवंत ठेवण्याचे कार्य केले. संतांचा रोज एक अभंग समजून घेतला तर जगणे समृद्ध होते. बहिणाबाईंची कविता आयुष्याचा अर्थ सांगते म्हणून नव्या पिढीने वाचनाकडे जाणीवपूर्वक वळले पाहिजे असे मत साहित्यिक महावीर जोंधळे यांनी व्यक्त केले.              

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात प्रख्यात साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस "जागतिक मराठी भाषा दिन" म्हणून साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या मराठी विभागाने यानिमित्त "लेखक आपल्या भेटीला" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ लेखक व पत्रकार महावीर जोंधळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जी.पी.सातव हे होते. याप्रसंगी बोलताना डॉ.जोंधळे म्हणाले की आपण घडत असताना  वि.वा. शिरवाडकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. इंदिरा संत, शांताबाई शेळके, ग. दि.माडगूळकर, विंदा करंदीकर, ग्रेस आदी मान्यवरांच्या सानिध्यात आल्यानंतर लेखक म्हणून घडणे शक्य झाले. मात्र त्यासाठी झपाटून जाणे हा स्वभाव झाला पाहिजे. आभासी जगात हरवून जाण्यापेक्षा स्वतःच्या अंतरंगात डोकवा, अर्थपूर्ण जगण्याचा ध्यास घ्या असेही ते म्हणाले. आपल्या सहजीवनाची हकीकत सांगताना महिन्याला पैसे नको , सोने नको, पण पुस्तके पाहिजेत असे सांगणारी जीवनसाथी मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

प्राचार्य डॉ. गंगाधर सातव यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा लाभ घेतला पाहिजे, अधिकाधिक पुस्तके आणून ग्रंथालय समृद्ध करण्यावर भर दिला जाईल. मात्र चांगले वाचकही घडले पाहिजेत असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. सूरज शिराळे याने आपल्या कवितेचे सादरीकरण केले. श्रावणी कोंढेकर हिने नृत्यातून गणेश वंदना सादर केली. या कार्यक्रमाला प्रा.डॉ. शोभा तितर, डॉ. सपना राणे, डॉ. मेघना भोसले, डॉ. सुनीता डाकले व सर्व प्राध्यापक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी या दिवशी महाराष्ट्रीय पोशाख परिधान करून हा दिवस साजरा केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.महादू बागुल यांनी  केले. विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी आभार व्यक्त केले. 


 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.