Skip to main content

नैसर्गिक संकटांमुळे शेत नापीक झाले, कर्ज फेडण्यासाठी सावकाराचा तगादा; कुटुंबाच्या पोशिंद्याने आयुष्यच संपवलं.

समर्थ भारत वृत्तसेवा:

सततची नापिकी, शेतावर येणारे अनेक संकट यातून मार्ग काढताना पैसा उरला नाही. यामध्येच खासगी सावकारासह बँकांचे कर्ज हप्ते कसे फेडणार, या विवंचनेत असलेल्या बीड जिल्ह्यातील रांजणी येथील ४२ वर्षीय शेतकरी अशोक सुखदेव औंधकर यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचे शेत सततच्या नैसर्गिक संकटांमुळे नापीक झाले होते.

खासगी सावकाराचं कर्ज, बँकेकडून घेतलेले उसने पैसे असा दुहेरी कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर होता. बँक आणि सावकाराने कर्ज फेडण्यासाठी सततचा तगादा लावल्याने अशोक औंधकर यांनी स्वत:चे जीवन संपविणे या मार्गाचा अवलंब केला. आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

औंधकर यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली दोन भाऊ आई-वडील आणि एक बहीण असा मोठा परिवार आहे. कुटुंबप्रमुख असणाऱ्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर पुढे कुटुंबाचं काय होणार? मुलींचे लग्न मुलाचं लग्न शिक्षण या गोष्टीकडे कोण बघणार? हे प्रश्न औंधकर कुटुंबासमोर आ वासून उभे राहिले आहेत. अशोक औंधकर यांचा मृतदेह शवाविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंददेखील झाली आहे.

मागील काही काळापासून कुठेतरी शेतकरी आत्महत्या सत्र हे थांबलेलं पाहायला मिळालं होते. मात्र आता पुन्हा एकदा कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायला मिळत आहेत. याची अनेक कारणे आहेत. यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. शासन आणि प्रशासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी निघालेल्या कर्ज योजना याच शेतकऱ्यांच्या मुळावर आल्याचं पाहायला मिळत आहे.


 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.