Skip to main content

रांजणगाव MIDC मध्ये माथाडीच्या नावाखाली चाललीये लुट : अरे ड्रायव्हर भाऊ जागा हो ऊठ...

समर्थ भारत वृत्तसेवा

शिरुर (तेजस फडके), ता. २९: आशिया खंडातील पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासुन माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून पैसे वसुल केले जात आहेत. परंतु पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक पोलिस प्रशासन याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याचे दिसत असुन यामुळे बाहेरच्या राज्यातून रांजणगाव MIDC त माल घेऊन येणाऱ्या वाहनचालकांना कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे.

रांजणगाव MIDC तील झामील स्टील कंपनीचे एच आर मॅनेजर राहुल भागवत यांनी दि 14 ऑगस्ट 2021 रोजी 200 रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माथाडी कामगार काशिनाथ चंदनराव पाचंगे यांच्यावर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. परंतु माझ्यावर कंपनी प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल करुन अन्याय केला असल्याचे सांगत पाचंगे यांनी या विरोधात मुंबई येथे उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. परंतु सध्या रांजणगाव MIDC त ढोकसांगवी गावच्या हद्दीत असणाऱ्या एक ते दोन कंपनीच्या बाहेर माथाडीच्या बोगस पावत्या फाडल्या जात असताना रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे तसेच उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी हे मात्र माथाडी बोर्डाने आमच्याकडे रीतसर तक्रार केली तर आम्ही कारवाई करु असे सांगत आहेत. मग माझ्यावर जेव्हा 200 रुपयासाठी गुन्हा दाखल केला त्यावेळेस हिच अट का लावण्यात आली नाही असा सवाल काशिनाथ पाचंगे यांनी केला आहे.

याबाबतपुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे अध्यक्ष व्ही व्ही घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या सचिवांच्या कानावर ही गोष्ट घातली असुन याबाबत पोलिस प्रशासनाकडुन सुद्धा याबाबत सुचना प्राप्त झाल्या आहेत. तसेच आम्ही माथाडीचे इन्स्पेक्टर पाठवून सदर बेकायदेशीर प्रकाराबाबत माहिती घेऊन येत्या काही दिवसात योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रांजणगाव MIDC तील झामील स्टील कंपनीत काशिनाथ पाचंगे हे रीतसर माथाडी कामगार असताना आणि त्यांचा काहीच दोष नसताना फक्त 200 रुपयांची माथाडीची पावती फाडली म्हणुन त्यांच्यावर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला गेला. परंतु ज्या गाडीचा नंबर फिर्यादीत नमुद केलेला आहे ती गाडी कंपनीत आलेलीच नसल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळे झामील कंपनीचे एच आर मॅनेजर राहुल भागवत तसेच माथाडी बोर्डाचे अधिकारी आणि रांजणगाव पोलिस यांची मिलीभगत असुन काशिनाथ पाचंगे यांना जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात अडकवले असल्याचा आमचा संशय आहे.-अ‍ॅड आम्रपाली धिवार

 

 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.