Skip to main content

शिरदाळे येथे विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा.

समर्थ भारत वृत्तसेवा

पारगाव, ता. २८: शिरदाळे ( ता.आंबेगाव ) भारताचा ७४ प्रजासत्ताक दिन  मोठ्या आनंदात उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजापूजन  शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष निवृत्ती तांबे, सदस्य दीपाली संदेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.  गावातील शेतकरी शांताराम चौधरी व निवृत्ती मिंडे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

शंकर दत्तात्रय तांबे यांच्या सप्तनीक व योगेश मारुती तांबे सप्तनीक तसेच सुनील मनोहर रणपिसे सप्तनीक या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामपंचायत ध्वजारोहण संपन्न झाले. दरवर्षी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते व गावातील पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम घेत असतो परंतु या वर्षी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य कमिटीने निर्णय घेत हा मान गावातील विधवा महिला, सरकारी सेवेतील मुले व त्यांचे पालक तसेच मा. सैनिक व गुणवंत विद्यार्थी यांना देण्याचे ठरवले होते.  

ग्रामपंचायतने एक आदर्श उपक्रम राबविला असल्याचे कौतुक यावेळी ग्रामस्थांनी केले. यावेळी शिरदाळे गावच्या सरपंच वंदना गणेश तांबे, उपसरपंच मयुर संभाजी सरडे, मा. सरपंच मनोज तांबे, ग्रामपंचायत सदस्य बिपीन चौधरी, गणेश तांबे, संतोष रणपिसे, पोलीस पाटील कल्पना चौधरी, मुख्याध्यापक गाढवे, अंगणवाडी सेविका शांताबाई चौधरी, जया रणपिसे तसेच ग्रामस्थ आणि युवक व विद्यार्थी मित्र उपस्थित होते. कु. राजवीर योगेश तांबे यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त शाळेला टेबल व अंगणवाडीसाठी डबल बर्नर शेगडी भेट देण्यात आली.

विधवा महिलांचा सन्मान करणारी ग्रामपंचायत

ग्रामपंचायत ध्वजपूजन; शालन तांबे, रामदास तांबे, सवित्राबाई चौधरी, बाळू रखमा चौधरी, मीना तांबे, सुरेश गेनभाऊ तांबे गावची निस्वार्थी सेवा करणारे कै. महादू भिका तांबे यांचे चिरंजीव इंदूबाई तांबे, सुभाष महादू तांबे यांना पूजनाचा मान दिला. तर माजी सैनिक कचर तांबे, सोसायटी संचालक कोंडीभाऊ तांबे व कांताराम तांबे यांना नारळ वाढवण्याचा मान दिला. यावेळी ग्रामपंचायत ध्वजारोहण प्रथमच गावातील विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले. यात गुंफाबाई महादू रणपिसे, गाजराबाई राधु थांबे, कांताबाई कैलास तांबे, कासुबाई विश्वनाथ तांबे, कचराबाई नामदेव तांबे या महिलांच्या हस्ते करण्यात आले. 

 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.