Skip to main content

शिवाजी विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहाचे उदघाटन.

समर्थ भारत वृत्तसेवा

लोणी धामणी, ता. २९: धामणी (ता.आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील सन १९९२-९३ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रुपये एक लाख ८५ हजार रु खर्च करून नूतनीकरण केलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे तसेच विद्यार्थ्यांना व्यायामासाठी लागणाऱ्या डबल व सिंगल बार, क्रीडा साहित्य प्रदान कार्यक्रमाचे उदघाट्न प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर एस.एस.सी. बॅच १९९२-९३ माजी विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

१४ ऑगस्ट २०२२ ला माजी विद्यार्थी मेळावा विद्यालयात पार पडला. या मेळाव्यात सर्वानुमते विद्यालयाचा सांस्कृतिक हॉल डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हॉल चे काम पूर्ण करण्यात आले असून माजी विद्यार्थी प्रवीण जाधव यांनी दहा हजार रुपये किमतीचे डबल बार, सिंगल बार व क्रीडा साहित्य विद्यालयास प्रदान केले. या वेळी दहावी बॅचच्या आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या नवीन इमारत बांधणीसाठी १ लाख ५१ हजार रुपयाची देणगी शाळेला दिली जाईल असे आश्वासन दिले असून माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेल्या भरीव  देणगीबद्दल त्यांचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.

कार्यक्रमाचे नियोजन डॉ. प्रा. काळुराम विधाटे, प्रविण जाधव, विष्णु विधाटे, ज्ञानेश्वर विधाटे, संदीप बढेकर, समीर नेवसे, रमेश वाघ, मंगेश जाधव यांनी केले. या वेळी कार्यक्रमास राजेंद्र पंचरास, राजेंद्र वीर, सुनीता भुजबळ, उज्ज्वला विधाटे, हुसेन पठाण, संतोष ढोबळे, रवी गोरडे, अनिल शिंदे, संतोष मांदळे, संतोष शेळके, रामहरी पिंगळे आदी माजी विद्यार्थी; तसेच शाळेचे मुख्याध्यापक डी. आर गायकवाड, माजी विद्यार्थिनी परवीन इनामदार, सर्व सेवकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विधाटे यांनी केले व आभार प्राचार्य गायकवाड यांनी मानले.

 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.