Skip to main content

अज्ञात चोरट्यांनी चोरल्या कालव्यावरच्या मोटारी.

समर्थ भारत वृत्तसेवा

बेल्हे, ता. ३०: येथील बांगरवाडी गावाच्या सीमेवरुन वाहणारा पिंपळगाव जोगा कालवा जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरला असून शेतक-यांचे बागायतदार होण्याचे स्वप्न साकार होताना दिसून येत आहे. परंतु हे होत असताना या महिन्यात विहिरींचे पाणी कमी झाल्याने शेतक-यांनी आपल्या मोटारी उचलपाण्यासाठी कालव्यावर ठेवल्या ख-या पण त्या मोटारीवर चोरट्यांची नजर गेली व रविवारी(दि.२९) रात्री ७.५ अश्वशक्तिच्या व अंदाजे दोन लाख रुपयांच्या ६ मोटारी केबल व स्टार्टरसह अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची माहिती बेल्हे शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र गफले यांनी दिली.

सोमवारी (दि.३०) सकाळी दिवसा वीजपुरवठा असल्याने गफले आपली मोटार चालू करण्यासाठी कालव्यावर गेले असता त्यांची मोटारचे पाईप कापून मोटार नेल्याचे दिसून आले व अधिक तपास केला असता बांगरवाडीचे माजी सरपंच पांडूरंग शिरतर, गोविंद बिचारे, नामदेव बांगर, संजय बांगर यांच्याही मोटारींची चोरी झाल्याचे दिसून आले. यापूर्वीही असे प्रकार झाले असून त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

संजय बांगर यांची मोटार दुस-यांदा चोरीला गेल्याने सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून पुन्हा नवीन मोटार आणण्याचा खर्च परवडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कालव्यावर याअगोदरही जवळपास ९ शेतक-यांच्या मोटारी चोरीस गेल्याचे समजले आहे. अगोदरच शेतमालाला बाजारभाव नाही,बेल्हे येथील एक सोयाबीन व्यापारी शेतक-यांचे लाखो रुपये बुडवून पळून गेला असून त्यात आता मोटारींची चोरी झाली असून अशा परिस्थितीत शेतक-यांनी जगावं कि मरावं असा प्रश्न माजी सरपंच पांडूरंग शिरतर यांनी विचारला.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.