Skip to main content

पुण्यातील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपींसह तिघांना केली अटक.

पुणे प्रतिनिधी:

पुणे मंडईतील रामेश्वर चौक परिसरात पुर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करुन कोयत्याने वार करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून पिस्तुल जप्त करण्यात आले. नाना पेठेत काही महिन्यांपूर्वी अक्षय वल्लाळ या तरुणाचा खून झाला होता. वल्लाळ याच्या खून प्रकरणाचा सूड उगविण्यासाठी तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

रूपेश राजेंद्र जाधव (वय.२४ वर्ष) रा. कुंभारवाडा, नाना पेठ, प्रथमेश गोपाळ येमूल (वय.२२ वर्ष) रा. नाना पेठ, बाळकृष्ण विष्णु गाजुल (वय.२४ वर्ष) रा. नाना पेठ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.तर शेखर अशोक शिंदे (वय.३२ वर्ष) हा जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बाळकृष्ण गाजुल हा मुख्य संशयित आरोपी आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या शेखर यास अडवून टोळक्‍याने त्याच्यावर पिस्तुलातुन गोळ्या झाडल्या, तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले. दरम्यान, भरवस्तीत गोळीबार व खुनाच्या प्रयत्नाची घटना घडल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

पसार झालेल्या आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनिट एककडून शोध घेण्यात येत होता. आरोपी रुपेश आणि साथीदार प्रथमेश कोंढवा भागात थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. त्यांचा साथीदार बाळकृष्ण याला मार्केट यार्ड परिसरात सापळा लावून पकडण्यात आले. आरोपींकडून पिस्तुल जप्त करण्यात आले.

काही महिन्यांपुर्वी झालेल्या अक्षय वल्लाळ याच्या खून झाला होता. किशोर शिंदे व त्याच्या साथीदारांनी हा खुन केल्याचा संशय वल्हाळ याचा मावसभाऊ बाळकृष्ण गाजुल यास होता. त्यातुनच गाजुल याने कट रचून किशोरचा भाऊ शेखर याच्यावर जीवघेणा हल्ला करुन खुनाचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.