Skip to main content

सर्पमित्रांनी कायद्याच्या अधीन राहून काम करावे – निलीमकुमार खैरे || पुणे जिल्ह्यातील युवकांनी उभारली वन्य जीव सामाजिक संस्था


 

समर्थ भारत वृत्तसेवा

प्रतिनिधी (प्रमोल कुसेकर), ता. १८: सर्पमित्र हे सापांपासून मानवाच्या रक्षणासह सापांच्या रक्षणाचे आदर्श काम करत असतात मात्र सर्पमित्रांनी कायद्याच्या अधीन राहून काम करावे असे प्रतिपादन प्रसिद्ध ज्येष्ठ सर्प अभ्यासक निलीमकुमार खैरे यांनी केले आहे.

                        शिक्रापूर ता. शिरुर येथील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांच्या पुढाकाराने नुकतीच वन्य जीवांच्या रक्षणासाठी निसर्ग वन्य जीव सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली, त्या संस्थेच्या अनावरण प्रसंगी सर्पमित्रांना मार्गदर्शन करताना प्रसिद्ध ज्येष्ठ सर्प अभ्यासक निलीमकुमार खैरे बोलत होते, यावेळी निसर्ग वन्य जीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे, संचालक अलताब सय्यद, राहुल तिकूटे, दिपक बनसोडे, साईदास कुसाळ, रमेश हरिहर, अभिजित वाघमारे, गणेश माटे, नरेश बावीसकर, नितीन शेरकर, अमोल कुसाळकर, विजय पडघन, शुभम मोरे, हेमंत परदेशी, सतीश भवाळ, साक्षी कांबळे यांसह आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निसर्ग वन्य जीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांनी केले तर सचिव अमर गोडांबे यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी बोलताना वन्य जीवांच्या बाबतचा कायदा कडक झालेला असून सर्वांनी कायद्याचे पालन करावे, वेळोवेळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच ज्येष्ठ सर्पमित्रांचे मार्गदर्शन घ्यावे, वन्य जीवांचे रक्षण करत असताना त्या वन्य पशु पक्षांना त्रास होणार नाही याची देखील काळजी घेत प्रत्येकाने स्वतःची सुद्धा विशेष काळजी घ्यावी असे आवाहन देखील ज्येष्ठ सर्प अभ्यासक निलीमकुमार खैरे यांनी केले. 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.