Skip to main content

अपहरण केलेल्या बालकाचा पोलिसांनी अवघ्या २३ तासांमध्ये लावला छडा.

पुणे प्रतिनिधी:

सिग्नलवर वस्तू विक्री करणाऱ्या दांपत्याच्या बालकाचे एका महिलेने अपहरण केले. रवी सुनील पवार व राधा पवार हे दाम्पत्य सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून उदरनिर्वाहासाठी तीन वर्षांपूर्वी पुण्यात आले. ते पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साहित्य विक्री करीत होते. मंगळवारी  नेहमीप्रमाणे तीन मुलांना सोबत घेऊन वस्तू विक्री करीत होते.

मिळालेल्या माहितीनुसार दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास त्याचे वडील हे चौकातील झाडांच्या कुंड्यालगत मुलांना बसवून वडापाव आणण्यासाठी गेले. त्यावेळी पत्नी सिग्नलवर वस्तू विक्री करीत होती. दहा मिनिटांमध्ये वडील परत आले असता त्यांना त्यांचा मुलगा तिथे नसल्याचे लक्षात आले. दोघांनी मिळून परिसरात शोध घेतला असता मुलगा मिळून आला नाही. यामुळे त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्या धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवताडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने आवश्यक ती कार्यवाही हाती घेतली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला मुलाला घेऊन जाताना दिसून आली. आरोपी महिलेचा माग काढण्यासाठी पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. दुसऱ्या दिवशी रात्री आरोपी महिलेने मुलाला शिरगाव येथील प्रतिशिर्डी साईबाबा मंदिरात सोडून दिल्याचे समजले. पिंपरी पोलिसांचे पथक शिरगाव येथे गेले. अपहरण झालेल्या ताब्यात घेवुन फिर्यादीकडे खात्री करून दिले. आरोपी महिलेचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवताडे यांनी सांगितले.

 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.