Skip to main content

पुणे जिल्ह्यातील १७६ ग्रामपंचायतीसाठी ८१ टक्के मतदान || मुळशी तालुक्यात सर्वाधिक तर खेड तालुक्यात सर्वात कमी मतदान

 समर्थ भारत वृत्तसेवा



पुणे, ता. १८: जिल्ह्यातील १७६ ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांतेतमध्ये मतदान झाले. सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी ६५१ मतदान केंद्रांवर रविवारी सरासरी ८१ टक्के मतदान झाले. निवडणुकीसाठी १ हजार २२९ उमेदवार रिंगणात असून निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवारी (२० डिसेंबर) होणार आहे.

पुणे  जिल्ह्यात सर्वाधिक मतदान मुळशीमध्ये झाले असून ८५.८२ टक्के मतदान झाले. भोरमध्ये ८५.०५ टक्के, बारामतीमध्ये ८४.९३टक्के तर दौंड ८३.९४ टक्के मतदान  झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. एकूण मतदारांपैकी १ लाख १८ हजार २४४ महिलांनी तर १ लाख २६ हजार ९२१ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्‍यातील १७६ ग्रामपंचायतींसाठी एकूण ३ लाख ३ हजार ५८९ मतदार आहेत. त्यापैकी रविवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत २ लाख ४५ हजार १६६मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानासाठी मतदान केंद्रांवर सकाळपासून गर्दी झाली होती. सकाळी साडे सात वाजता मतदानास सुरुवात झाली. सायंकाळी  साडेपाच वाजता मतदानाची प्रक्रिया संपली. दुपारी साडेतीन पर्यंत ७१ टक्के मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर  शेवटच्या दोन तासात दहा टक्के मतदान झाले, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेकडून सांगण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील मतदान

आंबेगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसांठी ७५.८९ %

बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी ८४.९३ %

भोर तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींसाठी ८५.०८ % 

दौंड तालुक्यातील आठ ग्रापंचायतीसाठी ८३.९४ %

हवेली तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींसाठी ७५.५६ % 

इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीसांठी ८३.७१ %

जुन्नर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ८३.५२ %

खेडमधील २१ ग्रामपंचायतींसाठी ७२.११ %

मावळ मधील ८ ग्रामपंचायतींसाठी ८९.६१ %

मुळशीतील ५ ग्रामपंचायतींसाठी ८५.८२ %

शिरूरमधील ४ ग्रामपंचायतींसाठी ८४.०६ %

वेल्हे तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी ८४.९० %

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.