Skip to main content

कपाशी आणि तुरीच्या पिकांमध्ये गांज्याची लागवड;पोलिसांनी केली कारवाई.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकाची लागवड केली आहे. दरम्यान सोयगाव तालुक्यातील एकाने दोन एकर क्षेत्रातील कपाशी व तूर पिकांमध्ये चक्क गांजाची लागवड केल्याची घटना समोर आली आहे. सोयगावच्या जरंडी शिवारात सोयगाव पोलिसांच्या कारवाईत हा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी तब्बल तीन तास कारवाई करून ६३ किलो ९५० ग्रॅम गांजाची झाडे हस्तगत करून ३ लाख वीस हजार ९५० रुपये मुद्देमाल शेतातून हस्तगत केला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव-बनोटी रस्त्यालगत जरंडी शिवारात एकाने कपाशी व तूर लागवड केलेल्या दोन एकर क्षेत्रात गांजाची लागवड केली असल्याची माहिती सोयगाव पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस निरीक्षक अनमोल केदार यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन जरंडी शिवारातील गट क्र. २९ मधून ६३ किलो ९५० ग्राम वजनाची गांजाची झाडे हस्तगत केली.

ही कारवाई सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनमोल केदार, उपनिरीक्षक सतीश पंडित, जमादार राजू मोसम बर्डे, गणेश रोकडे, ज्ञानेश्वर सरताळे, रवींद्र तायडे, अजय कोळी यांनी केली आहे. या कारवाईसाठी या पथकाला तब्बल साडेतीन तास लागले. यासाठी संपूर्ण दोन एकर क्षेत्रातील कपाशी व तूर पिकांमध्ये पोलिसांनी पाहणी केली. 

संशयित सुभाष महादू महाजन रा.जरंडी, ता. सोयगाव याच्याविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली. विशेष म्हणजे सोयगाव पोलिसांची चार वाजेपासून सुरू असलेली कारवाई तब्बल तीन तासांनी आटोपली. तर या प्रकरणी शेतात झाडात लपून बसलेल्या संशयिताला सोयगाव पोलिसांनी अटक केली आहे.


 

 

 

 

 

 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.