Skip to main content

कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात

पुणे प्रतिनिधी:




एमआयटी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री ही अपघाताची घटना घडली. या अपघातात दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 5 जण जखमी झालेत. सासवड पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या या अपघाताची नोंद करण्यात आलीय.
गौरव ललवाणी, वय 19 आणि रचित मोहता, वय 18 अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्या इतर पाच विद्यार्थ्यांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाच विद्यार्थ्यांमध्ये 3 मुलींचाही समावेश आहे.
एका तीव्र वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर रस्त्याच्या शेजारीच असलेल्या दुकानांना ही कार धडकली आणि उलटली. भरधाव वेगामुळे चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं असण्याची शक्यता वर्तवली जातेय. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारही जागच्या जागीच उलटली होती.
एमआयटी कॉलेजात शिकणारे हे सर्व विद्यार्थी असून ते देवदर्शनासाठी निघाले होते. नारायणपूरला देवदर्शनासाठी जाण्याचं बेत त्यांनी आखला होता. ठरल्याप्रमाणे ते देवदर्शनासाठी निघाले. पण वाटेतच काळानं त्यांच्यावर घाला घातला. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर इतर विद्यार्थ्यांचे पालकही धास्तावलेत.
पुरंदर तालुक्यातील सासवड-कापूरहोळ रस्त्यावर असलेल्या एका दत्त मंदिराशेजारी या विद्यार्थ्यांची महिंद्रा एक्सयूव्ही 300 कार अपघातग्रस्त झाली. ही कार उलटण्याआधी तिने मेघमल्हार टी हाऊस आणि शिवलक्ष्मी दुकानालाही धडक दिली. अखेर ही कार पलटी झाली.
स्थानिकांनी तातडीने पलटी झालेल्या कारच्या दिशेने धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या सगळ्यांना बाहेर काढलं आणि तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण त्यातील दोघांना डॉक्टरांनी आधीच मृत्यू झाले असल्याची माहिती दिली. अपघातातील सर्व विद्यार्थी हे वेगवेगळ्या राज्यातील असल्याची माहिती समोर आलीय. हे सर्व जण शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते.
दरम्यान, पुण्यातील अपघाताची ही घटना ताजी असतानाच तिकडे लातुराही भीषण अपघात झाला. आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला. एसटी बस आणि स्विफ्ट कारच्या झालेल्या अपघातात 5 जण जागीच 
जागीच ठार झाले, तर एक तरुणी या अपघातातून अगदी थोडक्यात बचावलीय. गेल्या 24 तासांत झालेल्या या दोन भीषण अपघातात 7 जणांनी जीव गमावलाय.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.