Skip to main content

लांडेवाडी येथे भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजीराव आढळराव पाटील प्रेक्षागृहाचा उद्घाटन समारंभ पार पडला.

मंचर प्रतिनिधी:

लांडेवाडी येथे भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजीराव आढळराव पाटील प्रेक्षागृहाचा उद्घाटन समारंभ पार पडला.हा सोहळा सिनेअभिनेते प्रशांत दामले, प्रवीण तरडे, रवी काळे यांसह जुन्नरचे माजी आमदार जिल्हाप्रमुख शरद सोनवणे फॉक्स वॅगनचे जनरल मॅनेजर जयेश सुळे, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, शिरूर हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी आंबेगाव जुन्नरचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर,डायनालॉग इंडियाचे कार्यकारी संचालक अक्षय आढळराव पाटील, खेड भाजप नेते अतुल देशमुख, कल्पना आढळराव पाटील, अपूर्व आढळराव पाटील, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, भाजप जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात, संपर्क नेते जयसिंग एरंडे आदी मान्यवरांच्या हस्ते झाला.

लांडेवाडी येथे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेले प्रेक्षागृह हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निश्चितच महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल असे मत यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

दरम्यान यावेळी एका लग्नाची पुढची गोष्ट या अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री कविता मेढेकर आणि अतुल तोडणकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या बहारदार  कौटुंबिक नाटकाने कलारसिकांचे मनोरंजन केले.याप्रसंगी सामाजिक-राजकीय व विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू आढळराव पाटील यांनी केले.


 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.