Skip to main content

आंबेगाव तालुक्यातील चास येथे प्राथमिक, माध्यमिक, आणि महाविद्यालयांना डस्टबिन वाटप.

मंचर प्रतिनिधी:

आंबेगाव तालुक्यातील सर्व प्राथमिकमाध्यमिक व महाविद्यालयांना पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य तुलसी सचिन भोर यांच्या पुढाकारातून बारा लाख रुपये किमतीचे २७३ डस्टबिन देण्यात आले. त्यामुळे शाळांचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहेअसे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील यांनी सांगितले.    

चास, ता.आंबेगाव येथे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी हिंगे पाटील बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती देवदत्त निकमजिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटीलराष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष सचिन भोरपोलीस निरीक्षक जीवन मानेशरद बँकेचे संचालक शिवाजीराव लोंढेकिसनराव सैदभीमाशंकरचे संचालक अंकित जाधवदादाभाऊ पोखरकरबाबासाहेब खालकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

तुलसी भोर म्हणाल्या “गावात व शाळेत कचरा होऊ नये म्हणून जागरूक नागरिक शाळांमधून घडावेतअशी अपेक्षा आहे. तसेच कृतियुक्ता शिक्षण ही काळाची गरज असून स्वच्छतेची सवय विद्यार्थ्यांना व्हावीयासाठी शाळांना डस्टबिन देण्यात आले आहेत.’’

 महात्मा गांधीसंत गाडगेबाबा या समाज सुधारकांनी अनेकदा स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे. माणसाने स्वच्छतेची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून केली पाहिजे. आजच्या काळात स्वच्छता ही काळाची गरज बनली आहेअसे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. 

व्यसनापासून विद्यार्थीयुवक व शिक्षकांनी दूर राहिले पाहिजेअशी अपेक्षा देवदत्त निकम यांनी व्यक्त केली. स्वच्छ व सुंदर शाळा योजना राबवा. चांगल्या शाळांचा गौरव कराअशी मागणी बाळासाहेब कानडे (गुरुजी) यांनी केली. प्रास्ताविक ए. एफ. इनामदार यांनी केले. के. के. सैद यांनी स्वागत केले. विनोद बोंबले यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन सुनील वळसे पाटीलसाहेबराव शिंदेएन. के. भालेरावमनोहर सांगळेए. बी. फुंदे यांनी केले. 



 

 


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.