Skip to main content

खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा.. खालुंब्रे येथील शुभम शिंदे यांना राज्यस्तरीय युवा कला गौरव पुरस्कार झाला जाहीर

खेड प्रतिनिधी:



राज्यस्तरीय युवा कला गौरव पुरस्कार खालुंब्रे येथील शुभम शिंदे यांना जाहीर झाला असून , संगीत व कला विभाग आर्ट बिट्स फाऊंडेशनकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.एक प्रतिभावान कलाकार व युवा पखवाज वादक म्हणून केलेल्या उलेखनिय कार्याची दखल घेऊन यंदाचा हा पुरस्कार खेड तालुक्यातील खालुंब्रे गावचे शुभम शिंदे यांना जाहीर झाला आहे.याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. 

या पुरस्काराची माहिती देताना आर्ट बिट्स पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले की ,आर्ट बिट्स ही संस्था गेली एकवीस वर्ष सातत्याने नामांकित कलाकारांना हे पुरस्कार त्यांच्या वैयक्तिक पातळीवर कामाची पाहणी करूंन जाहीर करण्यात येतात.यावर्षी संगीत कला या विभागात हा पुरस्कार खालुंब्रे गावचे शुभम शिंदे यांना जाहीर झाला आहे शुभम शिंदे हे एक प्रतिभावंत युवा कलाकार आहेत. समाधान महाराज सुरवडकर, अशोक महाराजजी पांचाळ यांचे ते शिष्य आहेत तर काही वर्ष ते जगविख्यात पखवाज वादक सुखद मुंढे ,अनुजा ताई बोर्डे यांच्या कडे त्यांनी  शिक्षण घेतले आहे.शुभम शिंदे यांनी  सुप्रसिध्द अशा अनेक शास्त्रीय संगीत महोत्सवामध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत साथसंगत केली आहे.एकल वादन इतर वाद्यासह संगीत, धृपद , गायन , वारकरी भजन ,क्लासिकल भजन असे त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत.शुभम शिंदे यांना उत्कृष्ट पखवाज वादक हा देखील पुरस्कार मिळाला आहे

शुभम शिंदे हे खालुंब्रे येलवाडी गावांचे ग्रामदैवत असलेल्या जोपादेवी मातेचे पुजारी आहेत. शुभम शिंदे हे गेल्या १२ वर्षांपासून पखवाज शिक्षण घेत आहेत. शुभम शिंदे यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला असून ते आपल्या पखवाज वादनाच्या कार्यक्रमातून आपल्या कुटुंबास मदत करत असतात. शुभम शिंदे यांच्या गुरुकृपा म्युझिक क्लासमधून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.गरीब विद्यार्थी शिकला पाहिजे व सर्वांनाच पखवाज शिकता यावा म्हणून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य पखवाज शिक्षण चालू केले आहे त्यामुळे असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पखवाज वादकांची संख्या जास्तीत जास्त वाढावी व उत्कृष्ट पखवाज वादक माझ्या गावातील व परिसरातील वारकरी भजनाला मिळावा आणि पखवाज ह्या पारंपरिक वाद्याचा विकास करण्यात छोटासा हातभार असावा म्हणून त्यांचा एक प्रयत्न आहे.शुभम शिंदे म्हणतात की हा पुरस्कार जांच्या कष्टाने आशीर्वादाने इथपर्यंत मी पोहोचू शकलो अशा माझ्या वडिलांना, माझ्या गावातील सर्व जेष्ठ नागरिकांना , वडीलधाऱ्या व्यक्तींना व जोपादेवी भजनी मंडळ खालुंब्रे यांना समर्पित करतो.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.