Skip to main content

वासुंदे - खडकवाडी रस्त्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी;आमदार निलेश लंके हस्ते १५ ऑक्टोबरला शुभारंभ.

पारनेर प्रतिनिधी:

पारनेर - संगमनेर तालुक्याला जोडणारा व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या वासुंदे ते खडकवाडी या ७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी त्याचा शुभारंभ वासुंदे येथे होणार असल्याची माहिती गुरुदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे व माजी सरपंच महादू भालेकर व रविंद्र झावरे यांनी दिली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाल्याने खडकवाडी, मांडवे, पळशी, वासुंदे, माळवाडी, देसवडे, बोकनकवाडी, लाखेवाडी, शिक्री, कामटवाडी, टेकडवाडी  व परिसरातील वाडी वस्तीवरील लोकांनी हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वेळोवेळी आमदार निलेश लंके यांच्याकडे केली होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्यासाठी भरीव असा ७ कोटी रुपये निधी रस्ता दुरुस्ती व मजबुती करण्यासाठी प्रथमच एवढे मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे. खडकवाडी वासुंदे परिसरातील १० ते १५ गावांसाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतकरी ऊस उत्पादक कांदा उत्पादक व शाळकरी मुलांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत होता. तर हा रस्ता अरुंद असल्याने अपघातांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली होती. परंतु आता या रस्त्याच्या मजबुतीकरण व रूंदीकरणासाठी मोठा निधी मिळाल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था दूर होणार असल्याची माहिती अमोल उगले, रविंद्रशेठ झावरे, सुदामराव शिर्के, संचालक रावसाहेब बर्वे, डॉ.उदय बर्वे यांनी दिली आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.