Skip to main content

दोन वर्षाच्या चिमुरड्याचा हौदात पडून मृत्यू.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क :

अलिकडच्या काळात लहान मुलांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांच्या मृत्यू होण्याच्या घटना वारंवार कानावर पडत आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात अशाच एका घटनेची नोंद झाली आहे. दोन वर्षाच्या लहान मुलाकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घराच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या हौदात पडूनच दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये यापूर्वी देखील पालकांच्या दुर्लक्षामुळे लहान मुलांचा कधी झोका खेळतांना फास लागून तर कधी बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.मागील आठवड्यातच आठ महिन्यांच्या बाळाने नेलकटर गिळले होते. ही घटना ताजी असतानाच घराच्या बाजूला असलेल्या दोन वर्षीय चिमूरड्याचा हौदात पडून मृत्यू झाला आहे.

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टाकळीरोड परिसरातील ही हृदयद्रावक घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास टाकळीरोड येथील पंचकृष्ण बंगला येथे ही दुर्दवी घटना घडली आहे.पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा आदी हे रमेश चव्हाण यांच्यासोबत राहतात. मुलगा घराबाहेर खेळत असताना जवळच असलेल्या सिमेंटच्या हौदाजवळ गेला.तो हौदाच्या भिंतीवर चढला आणि त्याचा थेट हौदातच तोल गेला. बराच वेळ होऊन मुलगा आदी दिसत नसल्याने आई सपना चव्हाण यांनी आदीचा शोध सुरू केला.

हौदाच्या जवळ जाऊन पाहिले असता मुलगा पाण्यात पडलेला दिसल्याने त्याला बाहेर काढले. मात्र, नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याला दवाखान्यात नेण्यात आले.जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून तो मृत असल्याचे सांगितले. यावेळी आदीच्या पालकांनी रुग्णालयातच मोठ्याने हंबरडा फोडला होता

घटनेची माहिती मिळताच पाहणी करत भद्रकाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.