Skip to main content

टाव्हरेवाडी गावाने महिलांसाठी उचलली नवीन पावलं...

मंचर प्रतिनिधी:

टाव्हरेवाडी गावांमध्ये महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) मुक्तीसाठी साळी मेडिकल फाउंडेशन व ग्रामपंचायत टाव्हरेवाडी व महिला बचत गट यांच्या सहकार्याने उचललं नवीन पाऊल गावातील १०५ महिलांची रक्त तपासणी तसेच व इतर तपासणी करण्यात आली. रक्त तपासणीच्या निष्कर्ष प्रमाणे रक्तक्षय असणाऱ्या स्त्रियांना पुढील उपचार औषधे साळी मेडिकल फाउंडेशन व एम क्यू आर फार्मसीटीकल कंपनी यांच्यातर्फे मोफत करण्यात येणार आहे. तसेच शारीरिक योग्य आहार व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन व परसबाग इत्यादी संबंधित वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार असून, टाव्हरेवाडीतील सर्व महिलांची रक्तक्षयापासून मुक्ती करण्यासाठी पुढील सहा महिने ते वर्षभर मोहीम राबवली जाणार आहे. डॉक्टर मोहन साळी यांनी सांगितल्याप्रमाणे या शिबिरासाठी गेटवेल हॉस्पिटल व हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी टाव्हरेवाडीतील ४६ महिला बचत गट चैतन्य संस्था यांचे सहकार्य लाभले. या शिबिरासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मा.संचालक बाळासाहेब टाव्हरे, लोकनियुक्त सरपंच तथा परिषदेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष उत्तमराव टाव्हरे , उद्योजक बबनराव टाव्हरे . उपसरपंच भरत टाव्हरे, ग्रामपंचायत सदस्य महेश टाव्हरे, सानिका टाव्हरे, ज्ञानेश्वर शिंदे, ग्रामसेवक तथा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत बारवे, ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र हिंगे, मोहिनी बांगर, आरोग्य कर्मचारी सुजाता पडवळ, अश्विनी एलभर, मिरा बांगर, शैला जांभळे, सर्व महिला बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव यांचे सहकार्य लाभले.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.