Skip to main content

शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मंचर ही आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य माणसांची संस्था - ॲड.अविनाश रहाणे.

मंचर प्रतिनिधी:

मंचर येथील शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेने आठ कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला आहे.रौप्यमहोत्सवी वर्षात पतसंस्था विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती अध्यक्ष शांताराम जाधव यांनी दिली.

मंचर येथील शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन शांताराम बापू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी विद्यालया शेजारील मंगलमुर्ती लॉन्स कार्यालयात पार पडली.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पतसंस्थेचे संस्थापक ॲड.अविनाश रहाणे, संचालक सुनील बाणखेले, सुरेश चव्हाण, संदीप गुंजाळ, संतोष डोके, रवींद्र सोनवणे, माधवी अविनाश रहाणे, विजया सुहास चव्हाण, दिनकर रोकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, सल्लागार अरुण नाना बाणखेले, गणपतराव कराळे, दत्तात्रय खानदेशे, लोकनेते माजी खासदार किसनराव बाणखेले, वि.वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन अरूण लोंढे, संचालक दत्तात्रय माशेरे, उत्तम शेठ भेके, दिनेश बाणखेले, कायदेविषयक सल्लागार विलास शेटे, पत्रकार सदानंद शेवाळे, धर्मवीर संभाजी पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी शंकरराव पिंगळे, भिमाशंकर नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण चिखले, तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे माजी चेअरमन राजु सोमवंशी, विद्यमान व्हा.चेअरमन विजय जाधव आदी उपस्थित होते.

संस्थापक ॲड.अविनाश रहाणे म्हणाले पंचवीस वर्षांपूर्वी सामान्य कुटुंबातील सदस्यांना बरोबर घेऊन शिवकल्याण पतसंस्थेची स्थापना केली.आता पतसंस्थेची प्रगती वेगाने सुरू आहे.चालू आर्थिक वर्षात सभासदांना १२ टक्के प्रमाणे लाभांश दिला जाणार आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी अहवाल वाचन केले.यावेळी सल्लागार गणपतराव कराळे, माजी प्राचार्य भीमराव बाणखेले, सोपानराव बाणखेले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेत संतोष बाणखेले, धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे अध्यक्ष सिताराम लोंढे, बाळासाहेब खानदेशे, वि.श.महामुनी, भास्कर सावंत, जागृती महाजन, विठ्ठल भाऊसाहेब पाचपुते यांनी सहभाग घेतला. आदर्श ऊस उत्पादक शेतकरी दत्तात्रेय खानदेशे तसेच आदर्श ठेवीदार व आदर्श कर्जदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सहकार अधिकारी मा.हिरामण ढोरे यांनी सहकार कायद्याविषयी माहिती व प्रशिक्षण दिले. संचालक संतोष डोके यांनी सूत्रसंचालन तर सुनील बाणखेले यांनी आभार मानले. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम पार पडला.सिने कलाकार बाळकृष्ण नेहरकर यांनी हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात महिला सभासदांनी उस्फुर्त सहभाग घेतला. संचालिका विजया सुहास चव्हाण या मानाच्या प्रथम पैठणीच्या मानकरी ठरल्या. तसेच तेजस्विनी अजित सोनवणे(पैठणी), मोनिका सुनील बाणखेले(पैठणी), प्राजक्ता योगेश थोरात(सोन्याची नथ), रीना संतोष डोके(टेबलफॅन) अनिता विकास जाधव(साडी), स्वाती किसन बाणखेले(साडी) बक्षीस देण्यात आले.तर सर्व सहभागी सभासदांच्या अर्धांगीनीना संस्थेच्या वतीने भेटवस्तु देण्यात आली.


 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.