Skip to main content

शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी म.गां.विद्यालयाला पोलीस बंदोबस्त द्या-शिवसेनेची मागणी.

मंचर प्रतिनिधी:

मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात शाळा भरण्याच्या शाळा सुटण्याच्या वेळी होणाऱ्या भांडणातून गुन्हेगारी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन या ठिकाणी सकाळी १० ते ११ दुपारी ते :३० च्या वेळेत महिला कॉन्स्टेबलसह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी मंचर शहर शिवसेनेच्या वतीने मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांच्याकडे करण्यात आली आहे.

मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयाच्या परिसरात दोन दिवसांपुर्वी नववी दहावीच्या विद्यार्थ्यां मध्ये झालेल्या कोयता हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांमध्ये निर्माण होत असलेली गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी त्यांच्यामध्ये कायद्याची दहशत असणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांत मंचर परीसरात टोळी युद्धातुन तरूणांचे खून झाले. मंचर हे शिक्षणाचे हब बनू पहात आहे.या शहरात महात्मा गांधी विद्यालयासारखे प्रथितयश शैक्षणिक संकुल आहे. शहरातुन तालुक्यातील जवळपास दोन ते तीन हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.शाळेला चांगला इतिहास आहे.परंतु ९वी ,१०वीत शिकणारी काही मुले शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यावर भांडणे करतात. दहशत निर्माण करण्यासाठी गावातून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना फोन करून बोलावून घेतात.यामुळे मुलिंची कुचंबणा होते.टोळी युद्धाचे स्वरूप प्राप्त होते. साऊथचे चित्रपट टि.व्ही.सिरीयल पाहुन अल्पवयीन मुलांमध्ये अशी गुन्हेगारी ्रवृत्ती वाढू लागली आहे. तिला वेळीच आवर घालण्यासाठी व कायद्याची दहशत रहाण्यासाठी सकाळी शाळा भरण्याच्या वेळी व दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी महिला कॉन्स्टेबलसह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. या मागणीचे निवेदन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा विद्यमान जिल्हा स॑घटक ॲड.अविनाश रहाणे व जिल्हा स॑घटक प्रा.राजाराम बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली दिल्याची माहिती युवासेनेचे मंचर शहर अधिकारी अमोल बाणखेले यांनी सांगितले.

यावेळी युवासेनेचे तालुका अधिकारी विवेक पिंगळे, शिवसेनेचे विभाग संघटक विजय जाधव, युवासेना तालुका चिटणीस महेश घोडके, आंबेगाव तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे माजी अध्यक्ष राजू सोमवंशी, शिवसेना उपशहरप्रमुख बाळासाहेब थोरात, युवासेना उपशहर अधिकारी अमोल काजळे, जमिल सय्यद, संजय चिंचपुरे, दिपक बाणखेले, चंद्रकांत रोकडे इत्यादी उपस्थित होते.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.