Skip to main content

चांडोली बुद्रुक येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित.

चांडोली प्रतिनिधी:

रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय मंचर भाग शाळा चांडोली बुद्रुक या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अटल बिहारी वाजपेयी विचार मंच यांच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे साहेब,आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे सर, अटल बिहारी वाजपेयी विचार मंच उपाध्यक्ष गणेश भाऊ बाणखेले, आरोग्यदूत सुशांत थोरात, विद्यालयाचे विभाग प्रमुख दशरथ काळे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली बुद्रुक मुख्याध्यापिका आजाब मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यासारख्या स्पर्धा परीक्षांची रूपरेषा स्पष्ट करताना या परीक्षांची पूर्वतयारी शालेय स्तरापासूनच करावी,तसेच विविध खेळांमध्ये सहभाग घ्यावा, राज्य,राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना प्रशासनात काम करण्यासाठी संधी मिळते, विद्यार्थ्यांनी चांगली स्वप्न पहावीत व ती सत्यामध्ये उतरवण्यासाठी कठोर मेहनत करावी, पोलीस प्रशासनातील कामाचे कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना अभ्यास व शारीरिक व्यायामाच्या जोरावर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पहिल्याच प्रयत्नात पोलीस निरीक्षक झालो असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे सर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशासनातील कामकाज समजून घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांच्याशी संवाद साधला.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अटल बिहारी वाजपेयी विचारमंचच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यामध्ये करियर मार्गदर्शन, महसूल कामकाजासंदर्भात मार्गदर्शन,सर्पदंशाच्या वेळेला प्राथमिक उपाययोजना,वैयक्तिक आरोग्य संदर्भात घ्यावयाची काळजी याविषयी विविध शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे डॉ.ताराचंद कराळे सर यांनी सांगितले तसेच चांडोली बुद्रुक भाग शाळेमध्ये पुढील काळात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी ३९४ विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. सुशांत थोरात यांनी प्रास्ताविक केले,तर केशव टेमकर यांनी सूत्रसंचालन केले व दशरथ काळे सर यांनी आभार मानले.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.