Skip to main content

चांडोली बुद्रुक येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित.

चांडोली प्रतिनिधी:

रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय मंचर भाग शाळा चांडोली बुद्रुक या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अटल बिहारी वाजपेयी विचार मंच यांच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे साहेब,आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे सर, अटल बिहारी वाजपेयी विचार मंच उपाध्यक्ष गणेश भाऊ बाणखेले, आरोग्यदूत सुशांत थोरात, विद्यालयाचे विभाग प्रमुख दशरथ काळे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली बुद्रुक मुख्याध्यापिका आजाब मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यासारख्या स्पर्धा परीक्षांची रूपरेषा स्पष्ट करताना या परीक्षांची पूर्वतयारी शालेय स्तरापासूनच करावी,तसेच विविध खेळांमध्ये सहभाग घ्यावा, राज्य,राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना प्रशासनात काम करण्यासाठी संधी मिळते, विद्यार्थ्यांनी चांगली स्वप्न पहावीत व ती सत्यामध्ये उतरवण्यासाठी कठोर मेहनत करावी, पोलीस प्रशासनातील कामाचे कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना अभ्यास व शारीरिक व्यायामाच्या जोरावर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पहिल्याच प्रयत्नात पोलीस निरीक्षक झालो असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे सर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशासनातील कामकाज समजून घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांच्याशी संवाद साधला.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अटल बिहारी वाजपेयी विचारमंचच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यामध्ये करियर मार्गदर्शन, महसूल कामकाजासंदर्भात मार्गदर्शन,सर्पदंशाच्या वेळेला प्राथमिक उपाययोजना,वैयक्तिक आरोग्य संदर्भात घ्यावयाची काळजी याविषयी विविध शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे डॉ.ताराचंद कराळे सर यांनी सांगितले तसेच चांडोली बुद्रुक भाग शाळेमध्ये पुढील काळात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी ३९४ विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. सुशांत थोरात यांनी प्रास्ताविक केले,तर केशव टेमकर यांनी सूत्रसंचालन केले व दशरथ काळे सर यांनी आभार मानले.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.