Skip to main content

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणीची आत्महत्या.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अकोला जिल्ह्याच्या बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील यावलखेड इथे घडली आहे. दर्शना प्रशांत पवार (वय.२४ वर्ष) राहणार बालाजीनगर, कात्रज, पुणे. असे मृतक विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. सासरच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. सध्या सासरकडील सर्व मंडळी फरार आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. मंगला अरुण सोळंके यांनी तक्रार दिली. त्यानुसार, दर्शना हिचा विवाह ६ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रशांत रामकृष्ण पवार रा. गायगाव, ता. शेगाव, ह.मु. बालाजीनगर, कात्रज याच्याशी झाला. प्रशांत एका खाजगी कंपनीत पुण्यात कामाला असतो. सासरचेही पुण्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे.

माहेरकडून दर्शनाला सोने-चांदीचे दागिनेसह ४ लाख ५० हजाराचे भेट वस्तू लग्नात देण्यात आल्या. नंतर दर्शना ही तिच्या पतीबरोबर पुणे इथे राहायला गेली. प्रशांत त्यांचे वडील रामकृष्ण आणि आई नंदा पवार असे चौघेही एकत्र राहत होते. काही दिवस चांगले गेले. नंतर मार्च २०२२ मध्ये छोट्या-छोट्या कारणांवरुन पती- सासरच्यांनी दर्शनाशी वाद घालायला सुरुवात केली. तुझ्या आई-वडिलांनी लग्नांमध्ये पाहुण्यांची काही सोय केली नाही. हलक्या दर्जाच्या वस्तू भेट दिल्या. तू खेळपट मुलगी आहे. असे वारंवार टोमणे द्यायचे. अन् मारहाण करायचे, असे नेहमी दर्शना फोनवर सांगायची. असेही तक्रारीत नमूद आहे. यासोबतचं तिला माहेरकडून १ लाख ५० हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावलाय. त्यानंतर माहेरच्यांनी तिला घेऊन अकोल्याच्या यावलखेडमध्ये घरी आणले. तेव्हा तिने झालेला पूर्ण त्रास माहेरच्यांना सांगितला.

प्रशांत पवार व सासरच्यांनी नेहमी दर्शनाला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तिला घरून पैसे आणण्यासाठी नेहमी तगादा लावला जात होता. शिवीगाळ करून मारहाण व जीवे मारण्याची धमकीही दिल्या जायाची. तिने तिच्या माहेरच्या लोकांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. मात्र माहेरच्यांनी आज ना उदया तिला सासरचे नांदवतील. परिस्थिती सुधारेल, या आशेने तिला समजावून सांगायचे. परंतु दर्शनाचा त्रास कमी न होता वाढत गेला. सासरचे तिला नेहमी नव-नवीन डिमांड करीत राहिले. दर्शना माहेरी असता तिला फोनव्दारे तुला वागवत नाही. प्रशांत दुसरे लग्न करेल, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळचं दर्शनाने आता आत्महत्याचं पाऊल उचललंय. बोरगाव मंजू पोलिसांनी पंचनामा केला. तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.