Skip to main content

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींना अखेर अटक.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

मुलींची छेड काढत असतांना त्यांना मदतीला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची ओळख पटली असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी आणि परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना शोधून काढले आहे. संदीप ज्योतीराम चव्हाण (वय.३२ वर्ष) रा. गांधीनगर, विकी नरसिंह रिडलोन (वय.३३ वर्ष) रा. गांधीनगर, हरिष अशोक चौधरी रा.बापूनगर असे या आरोपींची नावे आहेत. बेगमपुरा पोलीसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे. तर सचिन मधुकर म्हस्के (वय.३२ वर्षे) रा. पेठेनगर निसर्ग कॉलनी असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मस्के हे औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. दरम्यान नेहमीप्रमाणे ते आपल्या घरून पोलीस मुख्यालय येथे हजेरीसाठी जात होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतीगृहाजवळ तिन मुली त्यांच्याजवळ आल्यात. तसेच आम्हाला काही गुंड स्वरूपाचे मुलं मारहाण करत असून, आमची गाडी सुद्धा त्यांच्याजवळ असल्याचं म्हणाल्यात. त्यामुळे मस्के यांनी मदतीसाठी ११२ नंबर डायल करण्याचा त्यांना सल्ला दिला. तेवढ्यात मारहाण करणारी मुले सुद्धा तिथे पोहचली.  

या मुलींना तू मदत करणार का आणि पोलिसांना फोन करायला सांगतो का? म्हणत मारहाण करायला लागले. यावेळी आपण पोलीस असल्याच मस्के यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्यांना मारहाण सुरूच होती. मस्के यांना खालीपाडून लाथा बुक्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे मस्के यांनी कशीबशी आपली सुटका करून तेथून पळ काढत बेगमपुरा पोलीस स्टेशन गाठलं. 


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.