Skip to main content

गणेश फेस्टिव्हल २०२२ निमित्त श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन.

प्रतिनिधी:श्रीराम क्षीरसागर, श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग

गणेश फेस्टिव्हल २०२२ निमित्त श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे २  ते ४  सप्टेंबर या दरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या बैलगाडा मालकांना ३ लाख ५३ हजार रुपये रोख,सहा मोटरसायकली, २१ जुंपते बैलगाडे व तीन सोन्याच्या अंगठ्या असे भरघोस बक्षीस ठेवण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.नावनोंदणी रविवार दि. २८ रोजी होणार आहे. श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान तीर्थक्षेत्रात गणेशोत्सवात गणेश फेस्टिवल २०२२  साजरा केला जातो.यानिमित्त मागील सतरा वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते.कोरोनामुळे दोन वर्ष शर्यतीत खंड पडला.त्यानंतर यावर्षी भव्य स्वरूपात शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरणार आहे.शुक्रवार दि.२ ते रविवार दि. ४ सप्टेंबर यादरम्यान शर्यतीचा थरार रंगणार आहे.विजेत्या बैलगाडा मालकांना प्रथम क्रमांकासाठी १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस आहे. तीनही दिवस फळीफोडसाठी प्रत्येकी एक मोटरसायकल दिली जाणार आहे.द्वितीय क्रमांकासाठी १ लाख १ हजार रुपयाचे बक्षीस आहे. फळीफोड करणाऱ्या बैलगाड्यांना जुपते बैलगाडे, तृतीय क्रमांकासाठी ६१  हजार,चतुर्थ क्रमांकासाठी ४१ हजार रुपये तर फळीफोडसाठी जूपते बैलगाडे बक्षीस दिले जाणार आहे.प्रथम क्रमांकातील विजेत्या बैलगाड्यांची फायनल शर्यत होणार आहे.फायनल शर्यतीत तीन दिवस विजेत्या होणाऱ्या बैलगाड्यांना तीन मोटरसायकली,तीन सोन्याच्या अंगठ्या व तीन जुंपते बैलगाडे बक्षीस दिले जाणार आहे. सतत तीन वर्ष प्रथम क्रमांकात विजयी होणाऱ्या बैलगाड्यास तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. बैलगाडा शर्यतीची नावनोंदणी रविवार दि. २८ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत श्रीराम मंदिर वडगाव काशिंबेग येथे होणार आहे. बैलगाडा मालकांनी शर्यतीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. बैलगाडा शर्यतीच्या घाटाची व्यवस्था सुसज्ज अशी करण्यात आली आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.