Skip to main content

खड्ड्यामुळे तोल गेला, टँकरच्या मागच्या चाकाखाली गेल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: 

रस्त्यावरील खड्ड्यामुळे आणखी एका तरुणाचा जीव गेलाय. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे तोल गेला. समोरुन येत असलेल्या टँकरच्या मागच्या चाकाखाली हा तरुण चिरडला गेला. यामुळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दिवा आगासन रोडवर झालेल्या या अपघातमुळे एकच खळबळ उडाली होती. खड्ड्यामुळे झालेल्या अपघातातली मृत तरुणाचं नाव गणेश पाले असं आहे. या अपघातानंतर पालिका प्रशासन, सत्ताधारी आणि ठेकेदार यांच्यावर आरोप केला जातोय. युवकाच्या अपघाती मृत्यूला तेच जबाबदार असल्याची टीका केली जातेय. त्यामुळे या सगळ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी केली आहे. कोट्यवधी रुपये खूर्चनही रस्त्यावरील खड्डे काही कमी होत नाहीत. उलट दरवर्षी खड्ड्यामुळे अनेकांना जीव गमावाला लागतोय. त्यामुळे याप्रकरणी प्रशासन गांर्भीयाने केव्हा लक्ष घालणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.चाळण झालेल्या या रस्त्यावर मृत्यूचे खड्डे लोकांचे जीव घेत असल्याचं अधोरेखित झालंय. दरम्यान, या अपघाताची काळजाचा ठोका चुकावणारी दृश्यदेखील समोर आली आहेत.

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दोन बाईक, एक रिक्षा आणि एक व्यक्ती पायी चालताना दिसतोय. तर समोरच्या बाजूने एक टँकर येताना दिसतोय. एका स्कूटीवर जात असलेला तरुण खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करततो. पण एका खड्ड्यात तरुणाची स्कूटी आदळते आणि त्याचा स्कूटीवरील तोल जातो. यानंतर रस्त्यावर कोसळलेल्या तरुणाच्या शरीरवरुन समोरचा टँकर धडधडत जातो. मागून येत असलेल्या दुसऱ्या दुचाकी आणि रिक्षावाल्यासमोरच ही थरारक घटना घडते. या घटनेनंतर या मार्गावर वाहतूक कोंडीही होते. पण तरुणाला वाचवण्यासाठी स्थानिक प्रयत्न करतात. दुर्दैवाने ते यशस्वी होत नाहीत. भलामोठा टँकर शरीरावरुन गेल्यानं तरुणाचा जागीच जीव जातो.

याआधी ठाणे जिल्ह्यात जणांचा खडड्यामुळे जीव गेलाय. आता ही संख्या सातवर पोहोचली आहे. खड्ड्यांमुळे ट्रकच्या किंवा अवजड वाहनाच्या मागच्या चाकाखाली चिरडलं गेल्यांचा आकडा लक्षणीय आहे. अशाने मृत्यू होण्याचं प्रमाणही चिंताजनक असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. त्यामुळे अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन खड्ड्येप्रश्नी गंभीर आणि तातडीची पावलं उचलणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.