Skip to main content

नीरावागज येथे वीज पडून एकजण गंभीर जखमी.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

बारामती तालुक्यात नीरावागज गावात बुधवार (ता. २७) रोजी रात्रीच्यावेळी मुसळधार पावसात वीज कोसळली. या घटनेत एक मजूर गंभीर जखमी झाला. साहेबराव नारायण पवार (वय ६० वर्ष) रा.ऊरळी कांचन पुणे, हे जखमी मजूराचे नाव आहे. पवार यांना वीजेचा मोठ्या धक्का भसल्याने त्यांच्या मानेपासूनचा शरिराच्या डाव्या बाजूचा भाग भाजला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तसेच जखमीला वैद्यकिय उपचार होण्यासाठी रुग्णवाहिकेद्वारे बारामतीच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. परंतु संबंधित रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून हाॅस्पीलटला हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, नीरावागज येथे वीजेच्या धक्क्याने जखमी झालेले पवार हे कुटुंबियांसह घिसाडी काम करण्यासाठी ऊरळी कांचन येथून आले होते.

सरकारची मदत मिळणार

नीरावागज येथे पावसात वीज पडून घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. जखमी साहेबराव पवार यांना ससून येथे उपचार सुरू आहेत. नैसर्गिक आपत्ती हेडखाली राज्य शासन संबंधित जखमीच्या कुटुंबियांना मदत करू शकते. ७ दिवस उपचार झाले तर ४ हजार तीनशे रुपये दिले जातील, ७ दिवसांपेक्षा अधिक दिवस उपचार झाले तर १२ हजार रुपये देण्याची तरतूद आहे. याशिवाय काहीसे अपंगत्व आल्यास ५९ हजार शंभर रुपये, तर कायमचे अपंगत्व आले तर २ लाख रुपये संबंधितांच्या कुटुंबियांना दिले जातात. विशेषतः नैसर्गिक अपत्तीमध्ये मृत्यु झाल्यास मात्र ४ लाख रुपये संबंधितांच्या कुटुंबियांना अर्थिक मदत दिली जाते, अशी माहिती बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितली.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.