Skip to main content

‘हयात’ च्या खात्रीसाठी अर्धांगवायू ग्रस्ताला २ तास ताटकळत ठेवलं, प्रशासनाचा कारभार.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

प्रशासनातील अधिकारी किती निगरगट्ट झालेत, याचा प्रत्यय बीडच्या तहसील कार्यालयामध्ये काल सायंकाळी पहावयास मिळाला. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी हयात आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी एका अर्धांगवायूने त्रस्त झालेल्या लाभार्थ्याला कार्यालयात बोलून घेतले. सदर व्यक्ती तोच आहे का याची शहानिशा करण्यासाठी तब्बल दोन तास दारातच ठेवून घेतले. निगरगट्ट अधिकाऱ्याने दाखविलेल्या अमानवीय वागणुकीबद्दल सामाजिक स्थरातून संताप व्यक्त होतोय.  संजय गांधी निराधार योजनेतून लाभार्थ्याला महिन्याला एक हजार रुपयांचं मानधन मिळतं. मात्र ते मानधन मिळवण्यासाठी किती यातना सोसाव्या लागल्या, हे या व्यक्तीच्या व्हिडिओतून दिसतंय. हा व्हिडिओ सध्या बीडमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आसाराम आठवले हे तीन वर्षांपासून अर्धांगवायूचे रुग्ण आहेत. त्यांना संजय गांधी निराधार योजनेतून शासनाचे महिन्याकाठी एक हजाराचे मानधन मिळते. मात्र मागील वर्षभरापासून त्यांना हे मानधन मिळालेलं नाही. बीड तालुक्यातील पाटेगाव येथे आठवले पत्नी, मुलगा आणि सुनेबरोबर वास्तव्यास आहेत. कुटुंबाने त्यांचा हयातनामा प्रशासन दरबारी दिला असला तरी प्रशासनाने मात्र या अवस्थेत देखील त्यांना बोलावून घेतलं. तब्बल दोन तास त्यांना नायब तहसीलदार अरविंद काळे यांच्या कार्यालयाच्या दारात ठेवण्यात आलंय. हा प्रसंग पाहून अंगावर शहारे आणि प्रशासना विरोधात चीड आल्याशिवाय राहणार नाही. या अवस्थेत असताना देखील प्रशासनाला पाझर का फुटत नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

अर्धांगवायूने अंथरणात खिळून असलेल्या रुग्णाला खरं तर प्रशासनाने बोलवायला पाहिजे नव्हते. प्रशासनातील एखादी व्यक्ती घटनास्थळी जाऊन खातरजमा करायला हवी होती, मात्र तहसिल प्रशासनाकडून अमानवीय आणि चीड आणणारे कृत्य घडले आहे. तब्बल दोन तास रुग्णाला दारात ठेवून प्रशासन नेमकी कसली माहिती घेत होते याची चौकशी झाली पाहिजे. शिवाय संवेदनाहीन अधिकारी अरविंद काळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष तात्या थोरात यांनी केली आहे.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.