Skip to main content

मद्यधुंद चालकाने १३ वर्षीय शाळकरी मुलीला चिरडले; संतप्त जमावाने दिला ट्रक पेटवून.

पुणे प्रतिनिधी :

मद्यधुंद चालकाने १३ वर्षीय शाळकरी मुलीला चिरडल्याची घटना काटी-वडापुरी रोडवरती छोट्या कॅनल नजिक २९ जुलैच्या सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. मुलीला चिडल्यानंतर मद्यधुंद चालकास जमावाने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

तुप्ती नाना कदम (वय.१३ वर्ष) या विद्यार्थीनीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर गणेश नाना कदम वय १० वर्षीय विद्यार्थ्याला डोक्यात जबर मार लागल्याने इंदापुर येथील कदम बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्री काटेश्वर विद्यालय काटी येथे हे विद्यार्थी  शिक्षण घेत होते. इयत्ता सातवी व पाचवीमध्ये शिक्षण घेत होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याचे चुलते दुचाकीवरून शाळेत सोडवण्यासाठी जात असताना काटी वडापुरी रोडवरती खडीचा ओव्हरलोड टिपर घेऊन मद्यधुंद चालकाने पाठीमागून दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये तुप्ती व गणेश रस्त्यावरती पडले. चालक मद्यधुंद असल्याने धडक देऊन गाडीला ब्रेक न मारता डंपर तसाच साठ ते सत्तर फुटांपर्यंत नेला. डंपर तसाच पुढे गेल्याने तुप्ती पाठीमागच्या चाकाखाली येऊन तिचा जागीच मुत्यू झाला. तर गणेशच्या डोक्याला मार लागून तोही जबर जखमी झाला आहे. तर चुलता किरकोळ जखमी झाला आहे.

इंदापुर तालुक्यात ओव्हरलोड गाड्या व मद्यधुंद चालक बेफिकीर निष्पाप चिमुरड्याचे जिव घेत असताना प्रशासन मात्र कारवाईचा कोणताही बडगा उचलताना दिसत नाही. चालकाबरोबर प्रशासनही मद्यधुंद अवस्थेत आहेत का, असा सवाल संतप्त चिमुरड्याचे पालक विचारत आहेत.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.