Skip to main content

जखमी पोलिसांकडून आरोपींची धरपकड; पुलावरुन पडून कारचा चक्काचूर, तरीही 'ड्युटी फर्स्ट'.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

गुरे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी सिल्लोडकडे जात असताना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे वाहन पूलावरुन खाली कोसळून अपघात झाल्याची घटना घडली होती. विशेष बाब म्हणजे, अपघातानंतरही पोलीस थांबले नाहीत, 'ड्युटी फर्स्ट' असे म्हणत जखमी अवस्थेत पोलीस सिल्लोडला पोहचले व गुरे चोरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला जेरबंद केलं आहे. अपघात एवढा भीषण होता ती यात वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले होते. मात्र, यातही सुदैवाने वाहनातील तीनही कर्मचारी बचावले. कर्मचाऱ्यांना मुक्कामार लागला असून दुखापत झाली आहे.

चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुरे चोरीच्या गुन्ह्यातील संशयित हे सिल्लोड येथील असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरिक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. त्यानुसार त्‍यांनी पोलीस नाईक नितीन आमोदकर, पोलीस नाईक गोवर्धन बोरसे, पोलीस नाईक संदीप पाटील या कर्मचाऱ्यांना रवाना केले. कर्मचारी खाजगी वाहनाने सिल्लोड येथे जात असताना गाडी पूलावरुन कोसळून वाहनाचा अपघात झाला. यात वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला. त्यात सुदैवाने ते वाचले परंतु वाहनातील कर्मचाऱ्यांना मुक्कामार लागला तरी सुद्धा जखमी अवस्थेत तिघेही कर्मचाऱ्यांनी सिल्लोड येथे जाऊन गुरे चोरी करणाऱ्या टोळीला जेरंबद केलं.

टोळीने चाळीसगाव तालुक्यात चोरली तब्बल २० गुरे

शेख इम्रान शेख ईसा (वय.३० वर्ष), शेख ईब्राहीम उर्फ मौल्या शेख उस्मान (वय.२६ वर्ष) शेख उमेर शेख ताहीर (वय.२७ वर्ष) सर्फराज बिलाल खाटीक (वय.२२ वर्ष) शेख सत्तार शेख ईसा (वय.२४ वर्ष) शेख इरफान शेख ईसा (वय.३३ वर्ष) सर्व रा.आबदलशा नगर, इदगाह,सिल्लोड, जि.औरंगाबाद या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितांनी चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे येथून ६, वाघळी शिवार येथून ४, वडाळी आणि न्हावे येथून ३, जावळे येथून २ रोकडे फाटा येथून २ तसेच पिपंळवाड निकुंभ येथून ३ जनावरे अशी एकूण २० जनावरे सुमारे चोरी करुन नेल्याचं उघडकीस आलं आहे. संशयितांकडून ८ हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप गाडी वाहन देखील जप्त करण्यात आलेले आहे. गुरे चोरी केल्यानंतर सदर गुरांची विल्हेवाट सिल्लोड व मालेगाव येथे लावत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. अटकेतील संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.