Skip to main content

पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत चूक.

पुणे प्रतिनिधी:


पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी दि.२८ काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत चूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .बारामती तालुक्यातील २ गटांमध्ये याआधी  अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठीचे आरक्षण असतानासुद्धा हे २ गट खुले दाखविण्यात आले.परिणामी या २ गटात पुन्हा अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे .या चुकीमुळे गुरुवारी काढण्यात आलेली आरक्षण सोडत पुन्हा काढावी लागणार आहे .यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख  फेरसोडतीला परवानगी मागणारा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत .या वृत्ताला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान जिल्ह्यातील गटांची नव्याने सोडत काढली तरीही सुमारे पाच-सहा गटांचा अपवाद वगळता अन्य गटांचे आरक्षण फेरसोडतीतही कायम राहील,असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे .शिवाय हे २ गट खुला संवर्ग किंवा नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) असणार आहे .परिणामी सध्या ओबीसी आणि खुल्या गटासाठी जाहीर झालेल्या गटांतील एक किंवा दोन गटांचे आरक्षण बदलले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चक्राकार पद्धतीने आरक्षण जाहीर करणे बंधनकारक आहे .या पद्धतीनुसार याआधीच्या किमान चार निवडणूकिसाठीचे आरक्षण विचारात घेऊन त्या ठिकाणी एकाच प्रवर्गाच्या आरक्षणाची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घेतली जाते.बारामती तालुक्यातील सांगावी-वडगाव निंबाळकर हा गट २००२ मध्ये खुला,२००७ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि २०१२ मध्ये अनुसूचित जाती (महिला) अनुक्रमे या सर्वांगासाठी  आरकक्षित झाला होता. प्रत्यक्षात या तीनही निवडणुकीत हा गट खुला असल्याचे दाखविण्यात आल्याने ही चूक झाली आहे .

सहा दशकांत पहिल्यांदाच आरक्षण सोडत-

दरम्यान पुणे जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून(१९६२) आजपर्यंतच्या सहा दशकांत एकदाही फेर आरक्षण सोडत काढण्याची वेळ पुणे जिल्ह्यावर आली नव्हती .राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कित्येक वेळा असे प्रकार घडले आहेत .परंतु पुणे जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची फेरसोडत काढावी लागणार आहे.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.