Skip to main content

भीषण अपघात; ३ वर्षाच्या बालकासह आईचा जागीच मृत्यू.

पुणे प्रतिनिधी:

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्याजवळ शिलाटणे गावच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने पुढे जाणाऱ्या एका मोटारसायकलला मागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात मोटारसायकल वरील तीन वर्षांच्या बालकासह आईचा जागीच मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला आहे. पुष्पा पवन शर्मा (वय.२६ वर्ष), युवराज पवन शर्मा (वय.३ वर्ष) असे अपघातात मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे असून, पवन गणपतीलाल शर्मा (वय.२७ वर्ष) तिघेही सध्या रा.निगडी, मूळ रा. राज्यस्थान असे गंभीर जखमी झालेल्यांचे नाव आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन शर्मा हे त्यांच्या मोटारसायकलने त्यांची पत्नी पुष्पा व त्यांचा तीन वर्षाचा लहान मुलगा युवराज हे तिघे लोणावळ्यात फिरायला आले होते. लोणावळ्यात फिरून झाल्यानंतर ते पुन्हा निगडीला घरी चालले होते. कार्ला फाट्याजवळ शिलाटणे गावच्या हद्दीत त्यांच्या मोटारसायकलला मागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली. या भीषण धडकेत मोटारसायकलवरील तीन वर्षांच्या बालक आणि त्याची आई व वडील मोटारसायकलसह मार्गावर फेकले गेले.

या भीषण घटनेत युवराज व त्याची आई पुष्पा यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला झाला. तर वडील पवन शर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. त्यापूर्वी स्थानिकांनी जखमी झालेल्या पवन शर्मा यांना उपचारासाठी कामशेत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर कंटेनर चालक घटना स्थळावरून पळून गेला आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी शरद जाधव हे करीत आहेत.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.