Skip to main content

पत्नीला नाहक त्रास देत असल्याच्या कारणावरून नातवाने केला आजीचा खून.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

आंतरजातीय विवाह केल्यावरून आजी रजिया शेख ही सातत्याने माझ्या पत्नीला नाहक त्रास देत होती. तिचे चारित्र्य चांगले नसल्याचे सांगत विनाकारण ती पत्नीची बदनामी करीत होती, या रागातून रजिया शेख यांचा खून त्यांच्याच नातवाने केल्याची बाब उघड झाली आहे. शाहनवाज महेबूब शेख असे आजीचा खून करणाऱ्या त्या तरूणाचे नाव आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कमिशन एजंट म्हणून काम करणाऱ्या रजिया शेख या शनिवारपासून दिनांक २५ पासून बेपत्ता होत्या. घटनास्थळावरील परिस्थिती पाहून त्यांचा खून झाल्याची खात्री पोलिसांना झाली होती. ७२ वर्षीय महिलेचा खून कोणी का करेल, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी तिच्या नात्यातील लोकांकडे विचारपूस केली. त्यावेळी दोन दिवसांपूर्वी शाहनवाज व त्याची आजी रजिया यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला आणि त्याच्या ओळखीतील व्यक्तीमार्फत त्याला बोलावून घेतले. संशयित म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने आजीचा खून केल्याची कबुली दिली. सध्या शाहनवाज हा पोलिस कोठडीत आहे. खुनाची घटना समोर आल्यानंतर अवघ्या पाच तासांत शाहनवाजला पोलिसांनी पकडले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे, सदर बझार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, सहायक पोलिस निरीक्षक क्षीरसागर, पोलिस नाईक महेश शिंदे, तात्यासाहेब पाटील, राजु मुदगल, कुमार शेळके यांच्या पथकाने केली.

शाहनवाज शेख याची आजी रजिया शेख या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात बॉण्ड रायटर (कमिशन एजंट) म्हणून मागील अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत होत्या. त्या ज्याठिकाणी बसतात, तेथे खड्डा झाला होता. शनिवारी (ता. २५) काम संपल्यानंतर आजी तेथील दर्ग्याजवळ येणार असल्याची त्याला माहिती होती. त्यामुळे तो तेथेच थांबून होता. आजी आल्यानंतर रात्रीची वेळ झाली होती, परिसरात शांतता होती. हा डाव साधून त्याने खड्डा बुजवायला तेथील परिसरातून माती आणू म्हणून पडीक इमारतीत नेले. त्याठिकाणी त्याने आजीच्या डोक्यात कौलारू घातले आणि पोटात स्क्रू-ड्रायव्हर भोकसून खून केला.



 


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.