Skip to main content

धक्कादायक !प्रेमप्रकरणातून ३ महिलांची हत्या करत एकाची आत्महत्या.

मुंबई प्रतिनिधी:

मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.एका ड्रायव्हरने प्रेमप्रकरणातून डॉक्टरची पत्नी आणि त्याच्या दोन मुलीची हत्या करत स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.कांदिवली पोलिसानी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.सर्व मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले असून,घटनास्थळी सुसाईड नोटही सापडल्या आहेत,असे पोलीस सांगण्यात आले आहे.

किरण दळवी,मुस्कान दळवी,भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नाव आहेत.दरम्यान,भूमी दळवी नामक महिलेच्या प्रेमात पडल्याने तीन महिलांची हत्या करून गळफास घेतल्याचा उल्लेख ड्रायव्हर शिवदयाल याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे,या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार कांदिवली देना बँक जंक्शन येथे एक माणूस हातात विळा घेऊन फिरत आहे अशी माहिती कांदिवली पोलिसांना नियंत्रण कशावर मिळाली.त्यानुसार मोबाईल वाहनासह रात्र पाळीवर असलेल्या पोलीस निरीक्षक पीआय वारे घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी परिसराची झडती घेतली.लोकांशी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की त्यांनी एका व्यक्तीला २ महिलांसह दळवी हॉस्पिटलच्या इमारतीत जाताना पाहिले आणि त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला.डिटेक्शन कर्मचारी आणि मोबाईल कर्मचाऱ्यांच्या मदतीने परिसराची झडती घेतली असता रुग्णालयाच्या दुसऱ्या दोन महिलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडले.पहिल्या मजल्यावरही शोध घेतला असता तेथे दोन व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत आढळल्या अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे.याप्रकरणी कांदिवली पोलीस अधिक तपास करत आहेत.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.