Skip to main content

युवकांसाठी रविवार हा ठरला घातवार; मैत्रीचा धक्कादायक शेवट!

 मर्थ भारत न्यूज नेटवर्क:

अमरावतीमध्ये मैत्रीचा धक्कादायक शेवट झाल्याचं समोर आलं आहे. इथे दोन मित्रांचा एकत्रच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

नांदगाव पेठ धरणावर मौजमजा करण्यासाठी आलेल्या युवकांसाठी रविवार हा घातवार ठरला. धरणात पोहण्यासाठी गेलेला युवक बुडत असल्याने त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या युवकाने धरणात उडी घेतली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी येथील वाळकी धरणात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विनय शिवदास चव्हाण, (वय २० वर्षे), अभिषेक प्रदीप कुरळकर, (वय २१ वर्षे) असे घटनेत मृत्यमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. अमरावती आणि रहाटगाव येथील काही युवक धरणावर मौजमजा करण्यासाठी आलेले असतांना त्यातील अभिषेक प्रदीप कुरळकर रा. रहाटगाव हा पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला हे पाहून त्याठिकाणी असलेल्या विनय शिवदास चव्हाण रा. निशिगंधा कॉलनी अमरावती याने क्षणाचाही विचार न करता अभिषेकला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण दोघांचाही पाण्यात बुडून करूण अंत झाला.

घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आपत्ती व्यवस्थापनाला पाचारण केले. आपत्ती व्यवस्थापन चमू देखील त्याठिकाणी दाखल झाली. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास दोन्ही मृतदेह काढण्यात आपत्ती व्यवस्थापन चमूला यश मिळाले. दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय इथे पाठविण्यात आले. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण काळे यांचेसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर होते. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

वर्षभरातील ही दुसरी घटना असून आजवर चार युवकांनी याठिकाणी आपले प्राण गमावले आहे. विभागाने धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केलेली नसून दररोज याठिकाणी असंख्य तरुण तरुणी फिरायला येत असतात.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.