Skip to main content

विधवा मुलीशी मुलाचे लग्न करण्याची जबरदस्ती;धमकाविणाऱ्या सावकाराला अटक .

पुणे प्रतिनिधी:

व्यवसायासाठी घेतलेले १० लाख रुपयांचे कर्ज व्याजासह फेडल्यानंतरही आणखी व्याजाची मागणी करून समाजातील विधवा मुलीशी मुलाचे लग्न लाव,नाहीतर मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

अनिल जयभगवान बन्सल (वय.५३ वर्षे) रा.हरीगंगा सोसायटी,मार्केट यार्ड असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे.अनिल बन्सल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी कोथरूड मधील ५४ वर्षाच्या व्यावसायिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.हा प्रकार २४ जानेवारी २०१७ पासून आजपर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार,अनिल बन्सल यांचे मार्केटयार्ड येथे दुकान आहे.फिर्यादी यांनी बन्सल याच्या जयभगवान शिवकुमार अग्रवाल या मार्केट यार्ड येथील ऑफिसवर गेले होते.त्यांनी मुलाच्या व्यवसायासाठी पेपर कप मशीन खरेदी करण्यासाठी १० लाख रुपये दरमहा २२ हजार रुपये व्याजाने घेतले होते त्यापोटी बन्सल यांनी फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या कोथरूड येथील फ्लॅटची मूळ कागदपत्रे व कोरा चेक घेऊन करारनामा केला होता.फिर्यादी यांनी मुद्दल व व्याज असे एकूण १२ लाख ९३ हजार रुपये परत केले.तरीही त्यांची कागदपत्रे व चेक परत केला नाही.फिर्यादी यांच्या घरी जाऊन जबरदस्तीने आणखी व्याजाची रक्कम मागितली.त्यासाठी फिर्यादी यांनी वेळ मागितल्याने आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या समाजातील विधवा मुलीशी फिर्यादी यांचे मुलाचे लग्न लावून दे,असे सांगितले.नाहीतर फ्लॅटची कागदपत्रे देणार नाही असे बोलले.फिर्यादी यांनी विरोध केला असता त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली आहे.फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला असता त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली आहे.फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता.त्यानंतर पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर बन्सल याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.