Skip to main content

बांधकाम व्यावसायिकाला भोंदूबाबाने ठगवले तब्बल ५६ लाखाला.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

एका बांधकाम व्यावसायिकाला ५० कोटीचा पाऊस पाडून देतो असे आमिष दाखवत ५ जणांच्या टोळक्याने त्याची ५६ लाखाची फसवणूक केल्याची घटना शनिवारी सकाळी ठाकुर्लीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेश, शर्मा गुरूजी, अशोक गायकवाड, महेश आणि रमेश मोकळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. तर सुरेंद्र पाटील असे फसवणूक झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी चार संशयित आरोपींना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

ठाकुर्ली चोळेगाव येथे सुरेंद्र पाटील हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे दावडी गावात पाटीदार भवन येथे कार्यालय आहे. त्यांना पाच भोंदूबाबाच्या टोळीने १० टक्के पैसे पूजेसाठी दिले तर ५० कोटीचा पाऊस पाडून देतो असे सांगितले. त्यानुसार ५६  लाखाची रक्कम सुरेंद्र यांनी तयार केली. या भोंदूबाबाच्या टोळीने शनिवारी रात्री पाटील यांच्या पाटीदार भवन कार्यालयात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पूजा सुरू केली. पहाटेच्या सुमारास या टोळीने सुरेंद्रला त्याच्या इमारतीला पाच प्रदक्षिणा मारण्यास सांगितले. सुरेंद्रने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. याचा फायदा घेत भोंदूबाबाच्या या टोळीने त्यांच्यासाठी दिलेले ५६ लाख घेऊन तेथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठत अशोक गायकवाड, रमेश मुकणे, संजय भोळे, गणेश, शर्मा गुरुजी नावाच्या पाचही जणांविरोधात तक्रार दाखल केली. मानपाडा पोलिसांनी या तक्रारीवर कारवाई करत चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली आहेत.





पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.