Skip to main content

भिंतीखाली दबून सात वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत .

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

बीडमध्ये एका सात वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जेसीबीच्या साहायानं साफसफाई केली जात होती. दरम्यान, धक्का लागून भिंक कोसळली आणि त्याखाली ही चिमुरडी भिंतीखाली दबून गेल्यानं तिचा जीव गेलाय. यानंतर परिसरातील स्थानिक संतप्त झाले होते. जेसीबी चालकाला यानंतर स्थानिकांनी चोप दिली आणि पोलिसांच्या हवालेदेखील केलंय. रमजान ईद निमित्तानं यावेळी साफसफाई केली जात होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. भिंत कोसळून मृत्यू झालेल्या या सात वर्षीय चिमुकलीचं नाव सय्यद इकरा असं आहे. भिंती खाली दबून गुदमरल्यामुळे सय्यद हीचा जागीच जीव गेला. या जेसीबीचा चालक नवीन होता अशीही माहिती समोर आली आहे. ही घटना झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी जेसीबी चालकासह जेसीबीचीही तोडफोड केली.

ही दु्र्दैवी घटना माजलगावमध्ये घडली. माजलगावच्या इदगा मोहल्लामध्ये एक मोठी मशीद आहे. तिथं साफसफाईचं काम हाती घेण्यात आलं होतं. रमजान ईद असल्यानं नगरपालिकेकडून मशिदीच्या परिसराची स्वच्छता करण्याचं काम सुरु करण्यात आलं होतं. त्यासाठी जेसीबीदेखील मागवण्यात आला होता.

मात्र या भागातील चिंचोळ्या गल्लीतून जेसीबी आत नेताना अडचणी येत होत्या. तरिही जबरदरस्ती जेसीबी आतमध्ये घालण्यात आलेला. हा जेसीबी मशिदीसमोरील भिंतीजवळ आला असता, भिंतीला धक्का लागला आणि भिंत कोसळली. त्याचवेळी नेमकी सात वर्षांची सय्यद ही तिथून जात होती. तेव्हा तिच्या अंगावर ही भिंत कोसळली आणि ती भिंतीखाली दबल्यानं गुदमरली.

या घटनेनंतर जेसीबीच्या मदतीनंच तिच्या अंगावरील भिंत बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सय्यद हीचा मृत्यू झाला होता. जखमी सय्यदला पाहून तिच्या नातलगांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. यानंतर नागरिकांनी संतप्त होत जेसीबीवर दगडफेक केली. तसंच चालकाला मारहाणही केली. जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या. नंतर याप्रकरणी स्थानिकांनी रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या घातला होता. याप्रकरणी नगरपरिषद मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह चार जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



 

 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.