Skip to main content

चार वाहनांचा विचित्र अपघात! दोघे ठार तर ८ ते १० जण गंभीर जखमी

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

राज्यातील अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. अहमनगर- सोलापूर महामार्गावर गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. तीन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जीव गेला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहे. मालवाहतूक करणारा एक ट्रक, एक रीक्षा, क्रूझर जीप आणि टू व्हिलर गाडी यांच्या धडक होऊन विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की क्रूझर जीप आणि ट्रक यांच्यासह रिक्षाचंही मोठं नुकसान झालंय. चार वाहनांच्या विचित्र अपघातात कृष्णा मल्हारी बोरुडे आणि सोपान दिनकर काळे या दोघांचा मृत्यू झालाय. तर जखमी झालेल्या इतर दहा जणांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. नगर-सोलापूर रोडवरच्या कोकणगावच्या शिवारात बोराडे वस्तीजवळ हा अपघात घडला. या अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेत मदतीचा हात दिलाय.

नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील बोरुडे वस्ती इथून एक मालवाहू ट्रक जात होता. हा ट्रक सोलापूरहून नगरच्या दिशेनं निघालेलं. तर इतर वाहनं नगरहून सोलापरूच्या दिशेनं जात होती. मालवाहून ट्रकनं क्रूझर आणि ऍपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या रिक्षा रस्त्यावर पलटली. तर क्रूझरला दिलेल्या धडकेत गाडीचंही मोठं नुकसान झालंय. या अपघातात 25 वर्षीय तरुण कृष्णा मल्हारी बोरुडे याच्यासह सोपान दिनकर जागीच ठार झाले होते. तर गंभीर जखमी झालेल्या दहा जणांना तत्काल रुग्णालयात उपचारासाठी नगरला आणण्यात आलं.

राज्यात गेले काही दिवस सातत्यानं अपघाताच्या वाढत्या घटनांनी चिंता वाढवली आहे. राज्यातील अपघातात रस्ते बळींचीही संख्या चिंतजनक आहे. रात्रीच्या वेळीस बेदरकारपणे वाहनं चालवून किंवा वाहनांवरील नियंत्रण सुटून होत असलेल्या अपघातांमुळे अनेकांचे प्राण जात असल्याचं अधोरेखित झालंय. त्यामुळे काळजी व्यक्त केली जाते आहे.



 

 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.