Skip to main content

तरुणाने मारहाण केल्यामुळे गळफास घेऊन अल्पवयीन तरुणीची आत्महत्या

कोल्हापूर प्रतिनिधी:

कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणीनं आत्महत्या केलीय. या तरुणीच्या आत्महत्येचं कारण खळबळजनक आहे. डिपी ठेवला नाही म्हणून एका तरुणानं या मुलीला मारहाण केली होती. त्यानंतर नैराश्य आलेल्या तरुणीनं गळफास घेत जीव दिलाय. या घटनेनं कोल्हापुरात एकच खळबळ उडालीये. सविता खामकर असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. कोल्हापुरातील आजरा तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली. आत्महत्या केलेल्या मुलीला आजरा बस स्थानक परिसरात मारहाण करण्यात आली होती. डीपी ठेवला नाही, म्हणून या तरुणीला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय. त्यानंतर निराश झालेल्या या तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणारी ही तरुणी अल्पवयीन असल्याचीही माहिती समोर आली आहे. या आत्महत्येप्रकरणी पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलीनं केलेल्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अल्पवयीन मुली मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. किशोर सुरंगी या तरुणाविरोधात आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय.

किशोर सुरंगी या तरुणानेच सविताला आजरा बस स्थानक परिसरात मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. डीपी ठेवला नाही, म्हणून किशोरने सविताला मारहाण केली होती, असं सांगितलं जातंय. त्यानंतर निराश झालेल्या सवितानं गळफास घेत आत्महत्या केली. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.



 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.