Skip to main content

राज ठाकरे कार्यक्रमासाठी पुण्यात वसंत मोरे मात्र गैरहजर

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:


मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर उघड उघड नाराजी व्यक्त केल्याने त्यांना शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं होतं. यानंतर साईनाथ बाबर यांना पुणे शहराची सूत्र देण्यात आली. 

दरम्यान, वसंत मोरे यांनी मुंबईत जाऊन 'शिवतिर्थ'वर राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेटही घेतली. यानंतर पक्षातील वादळ शमल्याचं पाहायला मिळालं. वसंत मोरे यांनी  मी मनसेतच असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम लावला. यानंतर त्यांनी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, राज ठाकरे पुण्यात आल्यानंतर त्यांच्या दौऱ्यात वसंत मोरे गायब असल्याचं दिसतंय.

मुंबई आणि ठाण्यातील सभांना हजेरी लावणारे वसंत मोरे राज ठाकरे पुण्यात आल्यानंतर मात्र दौऱ्यात कोणालाही दिसले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीने सध्या पुन्हा चर्चा रंगली आहे. राज ठाकरे आणि मोरे यांच्यात दुरावा निर्माण झाल्यापासून मोरे पक्षाला रामराम करणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. पक्षपदापासून दूर केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांनीही फोन केल्याच्या बातम्या होत्या. मात्र, मनसेत कायम राहणार असल्याचं सांगत त्यांनी भूमिका मांडली.

राज ठाकरे एरव्ही पुण्याच्या दौऱ्यावर असताना शहरातील सर्व पदाधिकारी त्यांच्या दिमतीला असतात. पुण्यातील राजमहाल नावाच्या इमारतीत ठाकरे वास्तव्यास असतात. औरंगाबादला निघण्यापूर्वीही ठाकरे पुण्यात पोहोचले आहेत. १०० पुरोहितांच्या मार्फत मंत्रांचं पठण आणि काही धार्मिक विधी होणार आहेत. मात्र राज ठाकरे आल्यापासून वसंत मोरे यांची झलक कोणालाही मिळाली नाही. ते थेट औरंगाबादला उपस्थित राहणार असल्याचं समजतंय.

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.