Skip to main content

पाणीयोजनेसाठी कोणताही मोबदला न घेता अवघ्या रुपयात दिली एकरभर जागा

पारनेर प्रतिनिधी:

पारनेर शहरासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांची पाणीयोजना प्रस्तावित आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्याची तयारीही दाखविली आहे. ही योजना मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून कार्यान्वित होणार आहे. जलकुंभ, पंप हाऊस, जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागेची गरज होती. त्याकरिता स्व-मालकीची ३८  गुंठे जागा माजी नगरसेवक आनंदा औटी व शिक्षक नेते संभाजी औटी यांनी नगरपंचायतीस अवघा एक रुपया मोबदला घेऊन बक्षीसपत्र करून दिली. त्यांच्या दातृत्वाचे शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे.

शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून बिकट आहे. मात्र, आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेच्या निवडणूक प्रचारात, तसेच निवडून आल्यावर पारनेरकरांना शब्द दिला आहे. शहरासाठी कायमस्वरूपीची पिण्याच्या पाण्याची योजना केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा त्यांचा संकल्प होता.आमदार लंके हट्टाला पेटले असून, त्यांनी आता पाणीयोजनेसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यास सुरवात केली आहे.

या पाणीयोजनेचा सुमारे शंभर कोटी रुपयांच्या योजनेचा आराखडा तयार झाला आहे. मुळा बॅकवॉटरमधून पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा निधीही उपमुख्यमंत्री पवार यांनी देण्याचे कबूल केले. या योजनेसाठी शहरालगत पंप हाऊस, जलकुंभ, शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी जागेची नितांत गरज होती. मात्र, नगरपंचायतीची स्व-मालकीची जागा नसल्याने योजनेच्या प्रस्तावात त्रुटी येत होती. ही बाब औटी बंधूंना समजली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला, शहरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न यानिमित्ताने सुटत असल्याचा विचार करून, तसेच शहरातील जनतेची अडचण विचारात घेऊन, कोणताही मोबदला न घेता जागा देण्याचे त्यांनी मान्य केले. त्यांनी नगरपंचायतीच्या नावे ३८ गुंठे जागा फक्त एक रूपया मोबदला घेऊन बक्षीसपत्र करून दिली.

आमदारांनी मानले आभार

शहरासाठी एवढी मोठी जागा विनामोबदला दिल्याबद्दल आमदार लंके यांच्यासह शहरवासीयांनी औटी बंधूंचे आभार मानले, तसेच त्यांच्या दातृत्वाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.



 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.