Skip to main content

अपघातानंतर ‘बर्निंग कारचा थरार’

शिरूर प्रतिनिधी:

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी हद्दीत अपघाताचा धक्कादायक प्रकार समोर आला आहेप्रवाशी वाहतुक कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला यावेळी कारचा टायर फुटला या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मात्र अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला मदतीचा हात न देताच कार चालकाने टायर फुटलेला असतानाही कार भरधाव वेगाने पळवल्याचे समोर आले आहे. यामध्ये टायर तुटलेल्या अवस्थेत कार चालकाने तब्बल 5 ते 6 किलोमीटर कार चालवत शिक्रापुरपर्यंत पळवली   यावेळी धोकादायकरित्या कारच्या चाकाचा डिक्स मधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं
 अपघातग्रस्त व्यक्तीला मदतीचा हात देणे आवश्यक

पुणे नगर महामार्गावर वाहनांची वर्दळ कायम असते. घटनेच्या वेळीही रस्त्यावर मोठया संख्येने वाहने होती. याचवेळी प्रवाशी वाहतुक कार आणि दुचाकीचा भिषण अपघात झाला. या अपघातानंतर कार चालकाने कारण थांबवताचा वेगानं कारचालवत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघातग्रस्त कार वेगानं चालविल्याने त्या कारचा टायर फुटून रस्त्याला घासतते गेली यावेळी त्यातून मोठ्याप्रमाणात ठिणग्या बाहेर पडत होत्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघातस्थळापासून पळ काढण्यासाठी कार चालकाने हे कृत्य समोर आले आहे. या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलीस आरोपीचा शोध आहेत.

रस्त्यावर अपघात झाल्यावर अपघातस्थळावर मदत न करताच पळ काढणं हे चुकीचे असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केलं आहे. रस्त्यावर अपघात होताच असतात , मात्र या अपघातातही नागरिकांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवणे आवश्यक आहे. अपघातग्रस्त व्यक्तीला मदतीचा हात देणे आवश्यक असल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेतील आरोपीवर गुन्हा नोंद केला असून, त्याचा शोध घेण्याचं काम सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी दिली आहे.


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.