Skip to main content

बोगस डिश्चार्ज कार्डच्या माध्यमातून विम्याची रक्कम लाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कोरोना घोटाळा..!

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

कोरोना बाधित नसताना केवळ हेल्थ विमा पॉलिसीचे पैसे उकळण्यासाठी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याचे दर्शवण्यात आले. औरंगाबाद महापालिकेच्या चिकलठाणा मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला असून रुग्णाला येथून बनावट डिश्चार्ज कार्डदेखील मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा प्रकारे बोगस कार्ड तयार करून कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीकडून  जणांनी विमा कंपनी कडून  लाख ६०  हजार रुपये उकळले. हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

घोटाळा कसा उघड झाला?

औरंगाबादेत लस न घेताच बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सक्रीय झाली होती. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता कोरोनाचे उपचार न घेताच बोगस डिश्चार्ज कार्डच्या माध्यमातून विम्याची रक्कम लाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. कोटक जनरल इन्शुरन्समध्ये जहीर खान अजगर खान हे मुख्य व्यवस्थापक आहेत. कंपनीतील विम्यासाठी दाखल झालेल्या दाव्यांची पडताळणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.  जून २०२१ १२  जानेवारी २०२२  दरम्यान ११ दावे दाखल करण्यात आले होते. त्यातील कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी बुलेट हेल्थ केअर सर्व्हिसचे अधिकार केदारेश्वर अनिलराव सपकाळ यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी तपासणी करताना मनपा हॉस्पिटल, कोविड हेल्थ सेंटर, चिकलठाणा येथे भेट दिली. तेथील वैद्यकीय अधिकारी आशिष बोरगे यांनी इंदल राजपूत, प्रवीण पवार, इम्रान शेख आणि गणेश कडू यांचे डिश्चार्ज कार्ड बनावट असल्याचे लिहून दिले. त्यांनी उपचार घेतलेले नाहीत, असेही स्पष्ट केले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

बनावट रुग्णांवर गुन्हे

सदर प्रकरणीएमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनमध्ये  बनावट रुग्णांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात असित वाघ, अमोल रानसिंग, शिवाजी मुळे, शुभांगी राजपूत, किशनलाल गुर्जर, गणेश कडू, इंदल राजपूत, इम्रान मुश्ताक, प्रवीण पवार या आरोपींचा समावेश आहे. विमा कंपनीचे व्यवस्थापक जहीर खान यांनी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान,  पैकी पाच जणांनीच प्रत्येकी ५४  हजार ते ६०  हजार रुपयांपर्यंत पॉलिसीची रक्कम उकळली आहे. हा आकडा चार लाख ६२  हजार रुपये होतो. उर्वरीत चौघांनी साठ हजार रुपयांचा दावा दाखल केला होता. मात्र अद्याप त्याची रक्कम उचललेली नाही.

रुग्णालय कर्मचाऱ्यांचं काय?

बनावट डिश्चार्ज कार्डवर पैसे उकळणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र हे डिश्चार्ज कार्ड मेल्ट्रॉन सेंटरचेच आहे. त्यामुळे रुग्णालयाचे कर्मचारी या घोटाळ्यात सहभागी असू शकतात. त्यांचा शोध घेऊन कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच कोटक वगळता इतर विमा कंपन्यांमधून पैसे उकळण्यासाठीही असे बनावट डिश्चार्ज कार्ड करण्याची शक्यता असू शकते. त्याचा तपास कोण करणार, असा सवालही जनतेतून विचारला जात आहे.



 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.