Skip to main content

१ एप्रिलपासून कोरोना निर्बंध मुक्तीची गुढी

मुंबई प्रतिनिधी:

गुडीपाडव्याच्या दिवशी राज्यातील जनतेला एक दिलादायक बातमी मिळणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोकण्यात देशात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे गुडीपाडव्याच्या दिवशी कोविडचे निर्बंध पुर्णपणे हटवले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर आपत्ती व्यवस्थापण कायदा राज्यात लागू करण्यात आला होता. पण सध्या कोरोनाचा संसर्ग अल्प प्रमाणात असल्याने लावलेले निर्बंध हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे मास्क वापरणे आता बंधनकारक राहणार नाही. पण इतर देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने मास्क सोशल डिस्टन्सिंगसाठी सतत आवाहन करण्यात येत आहे.

गुडीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांना खूशखबर मिळणार

महाराष्ट्रात  एप्रिलपासून कोरोना निर्बंधातून मुक्ती होणार आहे. पण गुडीपाडव्याच्या दिवशीचं सगळ्यांना ही खूशखबर मिळणार आहे. दोन वर्षापासून मास्क वापरत असलेल्या जनतेची मास्कपासून सुटका होणार आहे. महाराष्ट्रात कोरोना साथीच्या दरम्यान राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेवर असलेले सगळे निर्बंध देखील हटणार आहेत. चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु भारतात कोरोना संसर्गाचं प्रमाण विपुल प्रमाणात आहे.

पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात चिंता

चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये सध्या कोरोनाने पुन्हा डोकेवरती काढल्याने चिंता वाढली आहे. चीनच्या अनेक महत्त्वाच्या शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक सार्वजनिक ठिकाणी लोकांची चाचणी सुध्दा करण्यात येत आहे. चीनमध्ये अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. भारतात केंद्र सरकारने कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथील केले आहेत. पण, केंद्राने राज्यांना महत्त्वाच्या सूचना देखील केल्या आहेत. मास्क आणि हात सातत्याने साबणाने धुतले पाहिजेत. तसेच सॅनिटाईज सुध्दा करणं गरजेचं आहे. जरी निर्बंध शिथील झाले तरी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



  

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.