Skip to main content

आजेसासू, बायकोसह दोन लेकरांची हत्या, अखेर हत्येचं गूढ उकललं

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

अहमदाबादमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडाने गुजरातसह महाराष्ट्रातही खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या ४८  तासांत या हत्याकांडाचा छडा लावला आहे. क्राईम ब्रांचने संशयित विनोद गायकवाड याला अटक केली आहे. विनोदने पत्नी, दोन अल्पवयीन मुलं आणि आजेसासूची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

एकाच घरातून पोलिसांनी चार कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. अहमदाबादच्या ओढव भागात राहणारी महिला, तिची आजी आणि १५  आणि १७ वर्षांची दोन मुलं यांची हत्या करण्यात आली होती.

हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या ४८  तासांत अहमदाबाद क्राईम ब्रांचने महिलेचा पती विनोद गायकवाडला हत्या प्रकरणातील संशयित म्हणून अटक केली आहे. हत्या करुन आधी तो अहमदाबादहून सुरत, तर तिथून इंदौरला पळून गेला होता.

ओढव भागातील दिव्यप्रभा सोसायटीतल्या एका घरातून दुर्गंधी येत होती. सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी घरात डोकावण्याचा प्रयत्न केला पण घराला बाहेर कुलूप होतं. स्थानिकांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घराचं कुलूप तोडून प्रवेश केला असता आत वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चौघांचे मृतदेह आढळला.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विनोद सारखे आपले जबाब बदलत होता, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. हत्येचं नेमकं कारण त्याने सांगितलेलं नाही. मात्र कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जिवंत ठेवायचा नसल्याने त्याने कुटुंबातील चौघांचीही हत्या केल्याचं सांगितलं.

आजेसासूवर आधीही हल्ला

विनोदने पत्नी, दोन अल्पवयीन मुलं आणि आजेसासूची हत्या केल्याचा आरोप आहे. आजेसासूवर त्याने याआधीही हल्ला केला होता, मात्र नातीची अवस्था पाहून आजीने याविषयी वाच्यता केली नाही. आजी आणि नात एकाच परिसरात राहत होत्या.



 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.