Skip to main content

स्वत:च्या स्वार्थासाठी, हौसेसाठी निष्पाप जीवांचा बळी; माणसं झाली‘जनावरं’ ...!

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

मालवण तालुक्यातील एका गावात बैलांच्या झुंजीत एका बैलाचा हकनाक बळी गेला आहे. मालवण तळगाव येथील एका मैदानात कुडाळ येथील दोन बैलाची झुंज आयोजित करण्यात आली होती. ही झुंज तब्बल एक तास सुरू होती. या झुंजीत वेंगुर्लेतील बैल झुंजीच्या दरम्यान जखमी झाला होता, त्या बैलाचा अखेर मृत्यू झाला आहे. बैलांच्या झुंजीला सुप्रीम कोर्टाची बंदी आहे. असे असताना हजारो लोकांच्या उपस्थितीत येथील खासदार विनायक राऊत यांच्या गावात घेण्यात आलेल्या या बैलांच्या झुंजीला परवानगी दिली कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या झुंजीचे व्हिडिओ व्हायरल होत असून या मुक्या जनावराचे विव्हळणे मन हेलावून टाकणारे आहे.

राजकीय पदाधिकाऱ्याशी संबंधित कार्यक्रम

झुंजीत विजयी झालेला बैल हा कुडाळ नेरूर गावातील एका राजकीय पदाधिकाऱ्याचा होता म्हणून पोलीस गप्प होते का, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना आता पडला आहे. याप्रकरणी आता कारवाईची मागणी होत आहे. तसेच अशाप्रकारच्या झुंजी होऊ नयेत, असाही सूर उमटत आहे.

प्राणीप्रेमी संतप्त

आता या बैलाच्या मृत्यूनंतर प्राणीप्रेमी असलेल्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. स्वार्थी माणसांनो, स्वत:च्या स्वार्थासाठी, हौशीसाठी निष्पाप जीवांचा बळी देऊ नका. तुम्ही स्वत: झुंजीला उभे राहाल का? स्वत:ला मृत्यूच्या दारात लोटाल का? त्यांना बोलता येत नाही याचा फायदा उठवता का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.



 


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.